एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसने अहमदनगरचा जिल्हाध्यक्ष बदलला, जयंत ससाणेंच्या पुत्राची नियुक्ती
राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत ससाणे यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली जाते. तसंच काही दिवसांपूर्वी ससाणे यांच्या पुण्यस्मरण दिनाला विखे पाटील यांनी थेट मुंबईहून नगरला हजेरी लावली होती.
शिर्डी/अहमदनगर : अहमदनगरच्या ज्या जागेवरुन काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे, तिथला जिल्हाध्यक्षच काँग्रेसने बदलला आहे. दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांची अहमदनगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
करण ससाणे हे माजी आमदार आणि शिर्डी देवस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. दोन वर्षांपूर्वी जयंत ससाणेंचं कर्करोगाने निधन झालं होतं. करण ससाणे सध्या श्रीरामपूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ससाणे माळी समाजाचे आहेत.
जयंत ससाणे यांचा श्रीरामपूर आणि विखे-पाटील यांचा राहता हे विधानसभा मतदारसंघ शेजारी आहेत. ससाणे यांचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर जयंत ससाणे विधानसभा निवडणूक लढले नव्हते.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील राज्यात मंत्री असताना, जयंत ससाणे साईबाबा संस्थान अध्यक्ष होते. या दोघांनी मिळून संस्थानच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली असून राज्यातही मदतीचा हात दिला आहे. शिवाय राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत ससाणे यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली जाते. तसंच काही दिवसांपूर्वी ससाणे यांच्या पुण्यस्मरण दिनाला विखे पाटील यांनी थेट मुंबईहून नगरला हजेरी लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement