एक्स्प्लोर

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

Rohit Pawar on Devendra Fadnavis: या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास, मोर्चे काढण्यास किंवा सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या 15 दिवसांच्या जमावबंदीच्या आदेशावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावरून थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का?" असा थेट सवाल करत रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान विविध कलमांतर्गत जमावबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास, मोर्चे काढण्यास किंवा सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याच निर्णयावर आक्रमक होत रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले.

मग 2029 पर्यंत जमावबंदी किंवा कर्फ्यू घोषित करा

रोहित पवार यांनी फडणवीस यांना उद्देशून लिहिले की, "मा. देवेंद्र फडणवीस साहेब, 23 जुलै पासून 6 ऑगस्टपर्यंत मुंबईत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास रोखणाऱ्या जमावबंदीचे आदेश लागू करण्याचं कारण काय? सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का? तरुणाईचा आवाज दाबायचं ठरवलंच असेल तर केवळ ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी घोषित न करता 2029 पर्यंत जमावबंदी किंवा कर्फ्यू घोषित करा, कारण त्यानंतर तरुणाईच तुमच्या सरकारला पायउतार करणार आहे."

मुंबईत मोठं आंदोलन उभं राहणार? 

दरम्यान, उद्धव ठाकरे मुंबईतून दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यांनी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांचं मनोबल उंचावलं. या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या संघर्षाला नमन करतच, "फक्त आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नको, तर या सरकारलाच घालवायला हवं," अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज (22 जुलै) भेटीगाठी करताना आंदोलनाला योग्य दिशेनं नेण्यासाठी चर्चा केली. आज सकाळी त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आंदोलनासंदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, "केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा सरकारकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याने वेगळ्या रणनीतीची गरज निर्माण झाली आहे." असे मत व्यक्त केले. 

हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा

दुसरीकडे, राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी तयारी करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर ज्या पद्धतीने मोठं आंदोलन उभं राहिलं आहे, दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतरही विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकजुट दाखवत जंतर-मंतरवरती तळ ठोकला आहे त्या पद्धतीने आंदोलन उभं राहणार का? याकडे लक्ष असेल.  

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget