एक्स्प्लोर

सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला भाजपपेक्षा कमी वेळ, संजय राऊतांची राज्यपालांवर नाराजी

भाजपला सत्तास्थापनेसाठी 72 तास आणि शिवसेनेला केवळ 24 तास राज्यपालांनी दिले, जास्त वेळ देणं राज्यपालांकडून अपेक्षित होतं अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ न देणे हा भाजपचा अहंकार आहे आणि सत्ता स्थापन न करता आल्याने शिवसेनेला जबाबदार धरणं चुकीचं आहे असं राऊत म्हणाले.

मुंबई: भाजप सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला संधी दिली आहे. आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याचा अवधी दिला गेला आहे, मात्र कमी वेळ मिळाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. भाजपला सत्तास्थापनेसाठी 72 तास दिले गेले होते परंतु शिवसेनेला फक्त 24 तासांचा अवधी मिळाला हा राऊतांचा आक्षेप होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ देणं अपेक्षित होतं अनेक लोकांना एकत्र करुन सरकार स्थापन करण्यात वेळ लागतो ही खंत त्यांनी व्यक्त केली. पण राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने 'ढकलायचंच' या 'चं' वर जोर देऊन ज्यांनी काम केलं त्यानुसार ही पावलं पडत आहेत, असा जोरदार आरोप संजय राऊत यांनी केला.

भाजप सर्वात मोठ्या संख्येने आमदार असल्याचा पक्ष असल्याने काल भाजपला बहुमत सिद्ध करण्याची संधी राज्यपालांनी दिली होती, मात्र शिवसेना सोबत नाही त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असमर्थता व्यक्त केली. सोबतच जनादेशाचा अनादर करुन राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जात असल्याने शिवसेनेला शुभेच्छा देत टोलाही लगावला.

Sanjay Raut | भाजपला सत्ता स्थापनेसाठी 72 तास, शिवसेनेला फक्त 24 तास? राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पावलं, संजय राऊतांचा आक्षेप | ABP Majha

युती आणि फॉर्म्युल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ न देण हा भाजपचा अहंकार आहे. आम्ही सत्ता लाथाडू पण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्रीपद आणि 50-50 फॉर्म्युल्यावर विचार करणार नाही, हा भाजपचा निर्णय होता. युतीपूर्वी ठरलेल्या गोष्टींवर चर्चा करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही, असंही राऊत म्हणाले. स्थिर सरकार देणं खरंतर भाजपची जबाबदारी होती त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांवर त्यांनी टीका-टिप्पणी करु नये, ज्यांनी खोटेपणाने राज्याला यात ढकललं ते खरे गुन्हेगार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.

भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं निवेदन अत्यंत दु:खद आणि खेदजनक आहे, भाजप सत्ता स्थापन करु शकला नाही याचं खापर त्यांनी शिवसेनेवर फोडणं चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. युती होण्यापूर्वी ठरलं त्यानुसार गोष्टी घडल्या असत्या तर आज "विरोधीपक्षात बसायला तयार आहोत" सांगायची वेळ आमच्या मित्रपक्षावर आली नसती आणि हे वागणं म्हणजे जनतेचा अपमान आहे असं संजय राऊत म्हटलं.

आज सकाळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं होतं. यावर संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या आदेशानं अरविंद सावंत राजीनामा देतील आणि एका मंत्रीपदासाठी त्या वातावरणात कशासाठी राहावं असं म्हणत शिवसेनेची केंद्रातील भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे दुर्दैव आहे आणि याचे धनी आम्ही नाही तर भाजप आहे अशी टीका संजय राऊतांनी मित्रपक्षावर केली. मात्र आम्ही शेवटपर्यंत राज्याला स्थिर सरकार मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करु असा विश्वास राऊत यांनी जनतेला दिला आहे. सोबतच भाजपचं शिवसेनाविरोधात काहीतरी षडयंत्रही सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget