एक्स्प्लोर

Eknath Shinde Speech : घासून-पुसून नाही तर ठासून विजय मिळवला, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde speech Live : "आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली."

मुंबई : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. 

शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकलं.संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवला. 

धनुष्यबाण पेलण्याची ताकद मनगटात लागते, ती आपल्या शिवसेनेत आहे. त्यामुळेच शिवसेनेला लोकांनी मतदान केले. मतांसाठी ऐवढी कसली लाचारी. बाळासांहेबंच्या विचाराला तिलंदाजी दिली. त्यांचे विचार पायदळी तुडवले. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकले. आपण तीन चार जागा आणखी जिंकलो असतो. आपण सहा जागा हरलो, त्यामध्ये का हरलो, त्यात जाऊ इच्छित नाही. आपल्याला महायुती मजबूत करायची आहे. मागचे सर्व विसरुन पुढे न्यायचं आहे. महायुतीमध्ये मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुमच्या साथीने मी ती जबाबदारी पार पडेल, असा सर्वांना वचन देतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं, काय म्हणाले एकनाथ शिंदे ? 

काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपण उठाव केला. मी सर्वांची भाषणं ऐकत होतो, दोन वर्षांपूर्वी आपण उठाव केला. तो खऱ्या अर्थाने आज निवडणुकीत जनतेने शिक्कामोर्तब करुन दाखवला. मतदारांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही हा मी शब्द देतो. 

बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी असायची. पण आज वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं. कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? मतांसाठी एवढी कसली लाचारी? धनुष्यबाण पेलायची ताकद फक्त शिवसेनेच्या मनगटात आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची अॅलर्जी आली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची लाज वाटतेय. 

खरी शिवसेना कुणाची? जनतेनेच सांगितलं 

ठाणे, कल्याण, कोकणात उबाठा साफ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ झाली. मुंबईत चार जागा कशा गेल्या, हे सर्वांना माहित आहे, ते मला सांगायची गरज नाही. उबाठाचा स्ट्राईक रेट 42 तर आपला 47 टक्के इतका आहे. आपण उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना कोणती? तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच सांगितले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Embed widget