एक्स्प्लोर

Eknath Shinde Speech : घासून-पुसून नाही तर ठासून विजय मिळवला, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde speech Live : "आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली."

मुंबई : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. 

शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकलं.संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवला. 

धनुष्यबाण पेलण्याची ताकद मनगटात लागते, ती आपल्या शिवसेनेत आहे. त्यामुळेच शिवसेनेला लोकांनी मतदान केले. मतांसाठी ऐवढी कसली लाचारी. बाळासांहेबंच्या विचाराला तिलंदाजी दिली. त्यांचे विचार पायदळी तुडवले. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकले. आपण तीन चार जागा आणखी जिंकलो असतो. आपण सहा जागा हरलो, त्यामध्ये का हरलो, त्यात जाऊ इच्छित नाही. आपल्याला महायुती मजबूत करायची आहे. मागचे सर्व विसरुन पुढे न्यायचं आहे. महायुतीमध्ये मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुमच्या साथीने मी ती जबाबदारी पार पडेल, असा सर्वांना वचन देतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं, काय म्हणाले एकनाथ शिंदे ? 

काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपण उठाव केला. मी सर्वांची भाषणं ऐकत होतो, दोन वर्षांपूर्वी आपण उठाव केला. तो खऱ्या अर्थाने आज निवडणुकीत जनतेने शिक्कामोर्तब करुन दाखवला. मतदारांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही हा मी शब्द देतो. 

बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी असायची. पण आज वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं. कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? मतांसाठी एवढी कसली लाचारी? धनुष्यबाण पेलायची ताकद फक्त शिवसेनेच्या मनगटात आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची अॅलर्जी आली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची लाज वाटतेय. 

खरी शिवसेना कुणाची? जनतेनेच सांगितलं 

ठाणे, कल्याण, कोकणात उबाठा साफ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ झाली. मुंबईत चार जागा कशा गेल्या, हे सर्वांना माहित आहे, ते मला सांगायची गरज नाही. उबाठाचा स्ट्राईक रेट 42 तर आपला 47 टक्के इतका आहे. आपण उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना कोणती? तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच सांगितले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश, आता भाजप अन् शिवसेनेचे संकटमोचक तडकाफडकी नाशिकला आले; गोकुळ गीते काय निर्णय घेणार?
बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश, आता भाजप अन् शिवसेनेचे संकटमोचक तडकाफडकी नाशिकला आले; गोकुळ गीते काय निर्णय घेणार?
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Embed widget