एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik : सतेज पाटलांच्या घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा, स्वतःच्या सत्तेसाठी छत्रपती घराण्याचा वापर; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल

Dhananjay Mahadik on Satej Patil, Kolhapur : भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये.

Dhananjay Mahadik on Satej Patil, Kolhapur : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, आज दुपारी घडलेल्या प्रकरानंतर भाजप नेते आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. 

दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होते म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान

धनंजय महाडिक म्हणाले, सतेज पाटील यांच्या दृष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली. दिल्लीवरून आलेली उमेदवारी  सोशल मीडियावर व्हायरल झाली.  मात्र काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांनी त्याला विरोध केला. यामुळे उमेदवारी बदलाची नामुष्की सतेज पाटलांवर आली.  उमेदवारीसाठी त्यांना थेट नवीन राजवाड्यावर जावा लागलं.  राजकारणासाठी या व्यक्तीने राजघराण्याचा कशा पद्धतीने वापर केला हे दिसतंय. मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेलं पत्र दुसऱ्या दिवशी आलं आणि वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिली पसंती त्यांची राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे  छत्रपतींना होते म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान आहे. 

सहा महिन्यापूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागत होते

राजू लाटकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी यशस्वी होऊ शकले नाहीत, ही त्यांची तिसरी नामुष्की आहे.  शाहू महाराज, मधुरिमा राजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊ उमेदवारी मागे घेतली. हे काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झाला असेल.  उमेदवारी मागे घेऊन कार्यालयातून बाहेर येत असताना ते व्हिडिओ  हे मन हेलावून टाकणार होते. सहा महिन्यापूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागत होते, ते आज महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्वाच्या भाषेत बोलत होते.  सतेज पाटील एवढे मोठे झाले आहेत का? तिथे आता राजघराण्यावर बोलू लागले आहेत. स्वतःच्या सत्तेसाठी छत्रपती घराण्याचा वापर करायचा आणि त्यांना असं अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं. हे सर्व आज कोल्हापूरकरांनी पाहिला आहे, कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत.  

आज उत्तरमध्ये झालेल्या एपिसोडचे परिणाम कोल्हापूर दक्षिण करवीर,शिरोळ, हातकणंगले या ठिकाणी असणाऱ्या पाचही उमेदवारांच सुफडा साफ होणार आहे. यामुळे कोल्हापुरात दहा विरुद्ध शून्य असा होईल. कोल्हापूरकरांच्या मध्ये सतेज पाटील यांच्या विरोधात काँग्रेस पक्षावर निर्माण झाला आहे.  काँग्रेस हा फोटो नरेटीव सेट करून मतं घेणारा पक्ष आहे. काँग्रेसला आता उतरती कळा लागली आहे.  ही त्यांच्या स्वभाव दोषामुळे परिस्थिती आली आहे. मी म्हणेल तोच कायदा या कोल्हापूरचा मालक आहे. काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता त्याचा गुरखा पाडण्याचं काम काँग्रेसने केला आहे. 

शाहू महाराज छत्रपती राजीनामा देणार आहेत म्हणून सोशल मीडियावरून ऐकायला मिळत आहे. ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा अवमान झाला आहे तो कोणीही सहन करणार नाही.  आजपर्यंत राजघराण्यावर अशा पद्धतीचे भाषा आणि वक्तव्य करण्याचे धाडस कोणीही केलं नाही.  सतेज पाटील स्वतःला सर्वोच्च समजत आहेत. ते आज ज्या पद्धतीने छत्रपती घराण्याला बोलले आहेत त्यामुळे त्यांचा मन दुखावलेलं असेल. हे वेदनादाई आणि दुःखदायक असल्याने महाराज हे सहन करणार नाहीत. त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर यात आश्चर्यकारक वाटून घेण्यासारखं काहीही नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Satej Patil : 2 वाजून 36 मिनीटांनी मालोजीराजेंचा फोन आला, सतेज पाटलांचे डोळे पाणावले; सर्वकाही सांगितलं

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget