एक्स्प्लोर

भिवंडीतील टोरेंट कंपनीकडून कोणावरही अन्याय सहन केला जाणार नाही : मुख्यमंत्री

शहरातील नागरिकांना टोरेंटकडून त्रास होत आहे. पण ज्यांनी टोरेंट आणले, तेच आता शिव्या देत आहेत, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. टोरेंटकडून कोणत्याही नागरिकावर होणारा अन्याय, गुन्हे आणि छळ सहन केला जाणार नाही.

भिवंडी : भिवंडीतील टोरेंट कंपनीकडून कोणावरही अन्याय सहन केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. खासदार कपिल पाटील यांच्या मागणीवरुन टोरेंटबाबत विशेष बैठक बोलावून नागरिकांना दिलासा देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कामतघर येथे आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यंत्रमाग व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, निवडणूक आटोपल्यानंतर यंत्रमागाच्या वीजपुरवठ्यासाठी 27 एचपीपर्यंत मिळणारे अनुदान 40 एचपीपर्यंत वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिकांसाठी सरकार संवेदनशील आहे. काही यंत्रमाग व्यावसायिकांनी माझी भेट घेतली. त्यात यंत्रमागावरील वीज अनुदानाची मागणी करण्यात आली. सध्या आचारसंहिता असल्यामुळे मी घोषणा करणार नाही, असे ते म्हणाले. शहरातील नागरिकांना टोरेंटकडून त्रास होत आहे. पण ज्यांनी टोरेंट आणले, तेच आता शिव्या देत आहेत, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. टोरेंटकडून कोणत्याही नागरिकावर होणारा अन्याय, गुन्हे आणि छळ सहन केला जाणार नाही.  तोडगा काढण्यासाठी निवडणूक आटोपल्यावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. भिवंडी मतदारसंघात पाच वर्षांत तब्बल 28 हजार कोटी रुपयांचा निधी आला. शहरात कॉंक्रीट रस्ते, उड्डाणपूल, पिण्याच्या पाण्यासाठी योजना, राष्ट्रीय महामार्ग अशा योजना सुरू आहेत. पण गेल्यावेळच्या खासदारांनी एक तरी काम दाखवावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. देशात दुराचार आणि भ्रष्टाचाराची मालिका कॉंग्रेसने सुरू केली. गेल्या पाच वर्षांत आम आदमींमध्ये परिवर्तन करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. कॉंग्रेसकडून गरीबी हटावची घोषणा करण्यात आली. मात्र, केवळ चेले-चपाट्यांचीच गरीबी कॉंग्रेसने हटविली. कॉंग्रेसला 60 वर्ष जनतेच्या विकासासाठी संधी होती. त्यावेळी 72 पैसेही वाटले नाहीत. तर आता 72 हजार रुपये काय देणार, असा सवाल फडणवीस यांनी केला. कॉंग्रेसचे घोषणापत्र म्हणजे `कोंबडी विकण्याचा धंदा' अशी टीका फडणवीस यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget