एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...

Chhagan Bhujbal : महायुतीत गृहमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असून यामुळे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडत असल्याची चर्चा रंगली आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाली. तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महायुतीत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. एकीकडे मुख्यमंत्रिपद भाजपला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी शिवसेना शिंदे गट गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर पडत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

नेमकं काय छगन भुजबळ? 

छगन भुजबळ म्हणाले की, गृहमंत्री पदावरून काही पेच नाही. त्याच्यावरून काहीही अडलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बाहेर होते, एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते, त्यामुळे शपथविधी थोडा पुढे गेला आहे. अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झाली आहे, प्रत्येक खातं महत्वाचं आहे. गृह खातं जेवढे चांगलं आहे तितकंच अडचणीच देखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो, त्याचे देखील प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गँगवॉर सुरू होता. काळी दिवाळी साजरी केली जात होती. मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते. गृहमंत्री पद म्हणजे काही सोपं काम नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, यावर चर्चा करून मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

संजय राऊतांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखातं स्वतः कडे ठेवायला हवं होतं.गृहखातं, विधानसभेचं अध्यक्षपद हे संवेदनशील विषय होते. ते आमच्याकडे नसल्याने आमचं सरकार पडलं, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मला नाही माहिती ते काय म्हणालेत. नाना पटोले यांनी जर विधानसभा अध्यक्ष पद सोडले नसते तर पुढच्या घटना घडल्या नसत्या, असे त्यांच्याच पक्षातील कोणीतरी म्हटले. सोयीचं बोलण्यात काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले. 

छगन भुजबळांचा गुलाबराव पाटलांना टोला

विधानसभेला आम्ही केवळ 85 जागा लढलो होतो. अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या. त्यामुळं आमच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले. यावरून छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. ते आमच्यासोबत नसते तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. तिघांनी मिळून जे चांगले निर्णय घेतले त्याचा फलित मिळालं असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

आणखी वाचा 

Suresh Mhatre Aka Balya Mama: मोठी बातमी: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget