एक्स्प्लोर

चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान

मुस्लिम उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा नसला तरी नसीम खान यांचा देखील एक मोठा मतदार आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभेला होणारी एकतर्फी निवडणूक यंदा मात्र प्रचंड चुरशीची होणार हे नक्की.

मुंबई उपनगरामधील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या या ठिकाणी काँग्रेसचे मोहम्मद आरिफ नसीम खान हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. 3 लाख 78 हजार मतदार असलेल्या या चांदिवली विधानसभा क्षेत्रात उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतदार हे प्रत्येक एक लाखांपर्यंत आहे. याचा मोठा फायदा आमदार नसीम खान यांना दर निवडणुकीला होत होता. त्यात शिवसेना भाजप वेगवेगळे लढल्याने या विधानसभेत नसीम खान हे सहज निवडून येत होते. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाल्याचे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवार ही जागा सहज जिंकू शकतो. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे हे या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेने देखील ही जागा जिंकायची असा निश्चिय केला आहे. त्यासाठीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे मुत्सद्दी आमदार अनिल परब यांना या विधानसभेचे विभाग प्रमुखपद देण्यात आले आहे. नुकत्याच  चांदिवली येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात अनिल परब यांनी या विधानसभेवर भगवा फडकविण्याची खुद्द उद्धव ठाकरे यांची इच्छा  असल्याचे सांगितले होते. शिवसेनेत अंतर्गत बंडाळी झाली नाही आणि भाजपने जर शिवसेनेला पुरेपूर मदत केली तर नसीम खान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. परंतु भाजप युवा मोर्चाचे  राष्ट्रीय सदस्य शुभ्रांशू दीक्षित देखील गेली दोन वर्षे या विधानसभेत निवडणूक लढविण्याचा दृष्टीने जनसंपर्क वाढवत आहेत. भाजपने तिकीट न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यातच आधी एमआयएममध्ये असलेले काही उमेदवार आता नव्याने वंचित बहुजन आघाडीमधून लढण्याची तयारी करीत आहेत. याचा फटका मात्र विद्यमान आमदार नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. चांदिवली विधानसभेचा इतिहास 2009 साली या विधानसभेतून काँग्रेसचे नसीम खान आणि तेव्हा मनसेत असलेले आणि आता शिवसेनेत असलेले दिलीप लांडे यांच्यात थेट लढत झाली होती. यात नसीम खान 82 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर 2014 साली दिलीप लांडे यांनी घाटकोपर पश्चिममधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या मतदार संघातून शिवसेनेतर्फे संतोष सिंग यांनी निवडणूक लढवली होती. तर मनसेचे ईश्वर तायडे उमेदवार होते. त्यामुळे नसीम खान यांनी तब्बल 73 हजारांपेक्षा जास्त मते मिळवून विजय मिळविला होता. सध्या स्थिती आकड्यांची गणिते 337 बूथ असलेल्या चांदिवली मतदार संघात मुस्लिम, उत्तर भारतीय आणि मराठी मतदार हा प्रत्येकी एक लाखाच्या जवळपास आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार असलेल्या पूनम महाजन यांना या मतदार संघातून 1,00998 मते तर आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांना 73,743 इतकी मते मिळाली होती. त्यामुळे चांदिवलीमधून नक्कीच युतीने चांगली बाजी मारली होती. सध्या या विधानसभा क्षेत्रातील नऊ नगरसेवकांपैकी सहा शिवसेनेचे, दोन भाजपचे तर एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. अशात या वेळी बहुजन वंचित आघाडी ने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा नसला तरी नसीम खान यांचा देखील एक मोठा मतदार आहे. त्यामुळे  प्रत्येक विधानसभेला होणारी एकतर्फी निवडणूक यंदा मात्र प्रचंड चुरशीची होणार हे नक्की. जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget