एक्स्प्लोर

Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य

Jayant Patil speech in Sangli: अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावा, सत्तेसाठी एकेक आमदार महत्वाचा, सत्ता आली नाही तर कुत्र पण विचारणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

सांगली: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी  ताकद लावली तर महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल. राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आता  काय कुणाला घाई नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. 

पलूस कडेगाव मतदार संघात विकास भरपूर झाला आहे. तरीदेखील आणखी काही विकास काम असतील तरी सांगा असे आमदार कदम  म्हणतात. त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम असेही जयंत पाटील यांनी म्हटलेय.  महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा उमेदवार या महाराष्ट्रात निवडून  आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. 

राजकारण थोडंसं बाजूला ठेव लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र  थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत असेल तर ते थोडसं बाजूला ठेवा  आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. जर सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. बंडखोरी करण्यासाठी आज जी लोकं मोठ्याने बोलत आहेत ती  माणसं परत आवाज काढणार नाहीत, निवांत घरात जाऊन बसतील, रिटायर होतील. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकवू नका. आता सरकार येण्यासाठी तुम्हा सगळ्यांनी प्रयत्न करा असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

जयंत पाटलांची भाजपवर जोरदार टीका

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. मात्र, हे मान वर करुन विचारू शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.  70 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसलेत. ज्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला या लोकांनी मित्र पक्षाची तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनलममध्ये घेतलेले आहे.  म्हणजे भारतीय जनता पक्ष हा आडवाणींचा आणि अटलबिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील ही भ्रष्ट राजवट दूर करायची असेल पक्षाची फोडाफोडी थांबायचे असेल तर एकसंधपणाने काम केले पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

राहुल गांधी मुंबईत विधानसभेचा नरेटिव्ह सेट करणार, 5 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीणबाबत महत्त्वाचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
Embed widget