एक्स्प्लोर

Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य

Jayant Patil speech in Sangli: अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावा, सत्तेसाठी एकेक आमदार महत्वाचा, सत्ता आली नाही तर कुत्र पण विचारणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

सांगली: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी  ताकद लावली तर महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल. राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आता  काय कुणाला घाई नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. 

पलूस कडेगाव मतदार संघात विकास भरपूर झाला आहे. तरीदेखील आणखी काही विकास काम असतील तरी सांगा असे आमदार कदम  म्हणतात. त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम असेही जयंत पाटील यांनी म्हटलेय.  महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा उमेदवार या महाराष्ट्रात निवडून  आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. 

राजकारण थोडंसं बाजूला ठेव लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र  थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत असेल तर ते थोडसं बाजूला ठेवा  आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. जर सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. बंडखोरी करण्यासाठी आज जी लोकं मोठ्याने बोलत आहेत ती  माणसं परत आवाज काढणार नाहीत, निवांत घरात जाऊन बसतील, रिटायर होतील. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकवू नका. आता सरकार येण्यासाठी तुम्हा सगळ्यांनी प्रयत्न करा असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

जयंत पाटलांची भाजपवर जोरदार टीका

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. मात्र, हे मान वर करुन विचारू शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.  70 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसलेत. ज्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला या लोकांनी मित्र पक्षाची तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनलममध्ये घेतलेले आहे.  म्हणजे भारतीय जनता पक्ष हा आडवाणींचा आणि अटलबिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील ही भ्रष्ट राजवट दूर करायची असेल पक्षाची फोडाफोडी थांबायचे असेल तर एकसंधपणाने काम केले पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

राहुल गांधी मुंबईत विधानसभेचा नरेटिव्ह सेट करणार, 5 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीणबाबत महत्त्वाचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Embed widget