एक्स्प्लोर

Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य

Jayant Patil speech in Sangli: अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावा, सत्तेसाठी एकेक आमदार महत्वाचा, सत्ता आली नाही तर कुत्र पण विचारणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

सांगली: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी  ताकद लावली तर महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल. राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आता  काय कुणाला घाई नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. 

पलूस कडेगाव मतदार संघात विकास भरपूर झाला आहे. तरीदेखील आणखी काही विकास काम असतील तरी सांगा असे आमदार कदम  म्हणतात. त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम असेही जयंत पाटील यांनी म्हटलेय.  महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा उमेदवार या महाराष्ट्रात निवडून  आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. 

राजकारण थोडंसं बाजूला ठेव लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र  थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत असेल तर ते थोडसं बाजूला ठेवा  आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. जर सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. बंडखोरी करण्यासाठी आज जी लोकं मोठ्याने बोलत आहेत ती  माणसं परत आवाज काढणार नाहीत, निवांत घरात जाऊन बसतील, रिटायर होतील. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकवू नका. आता सरकार येण्यासाठी तुम्हा सगळ्यांनी प्रयत्न करा असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

जयंत पाटलांची भाजपवर जोरदार टीका

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. मात्र, हे मान वर करुन विचारू शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.  70 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसलेत. ज्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला या लोकांनी मित्र पक्षाची तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनलममध्ये घेतलेले आहे.  म्हणजे भारतीय जनता पक्ष हा आडवाणींचा आणि अटलबिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील ही भ्रष्ट राजवट दूर करायची असेल पक्षाची फोडाफोडी थांबायचे असेल तर एकसंधपणाने काम केले पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

राहुल गांधी मुंबईत विधानसभेचा नरेटिव्ह सेट करणार, 5 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीणबाबत महत्त्वाचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget