एक्स्प्लोर

"एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान", फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट!

लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर आता मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा होत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Result) भाजप आणि महायुतीला (Mahayuti) फटका बसला आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याची मी जबाबदारी घेतो. मला जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती मी केंद्रातील नेत्यांना करणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. असे असतानाच भाजपचे मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. एकीकडे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली असताना कंबोज यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?

मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं आहे. फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं आहे. राज्यातले मंत्री आणि ज्येष्ठ नेतेही पराभवासाठी जबाबदार आहेत. महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपनं आत्मपरिक्षण करायला हवं, असं मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 

कंबोज यांचा रोख कुणाकडे?

कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीतील कामगिरीला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, असे विचारले जात आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

या लोकसभा निडणुकीत महायुतीच्या जागा घटल्या. भाजपच्याही जागा कमी झाल्या आहेत. या खराब कामगिरीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. भाजपच्या या खराब कामगिरीची मी जबाबदारी स्वीकारतो. मला मंत्रिमंडळातून मुक्त करावं, अशी विनंती मी केंद्रातील शीर्षस्थ नेत्यांना करणार आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करण्यासाठी हा निर्णय घेण्याची मी तयारी केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

दरम्यान, फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका मांडली. मी केंद्राशी चर्चा करणार आहे. "त्यानंतरच मी निर्णय घेणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण त्यांना सरकारच्या बाहेर जाऊन काम करण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहूनच ते संघटनेत काम करू शकतात. पुढच्या काळात फडणवीस यांच्यासोबत आम्ही राज्याला, पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची गरज नाही, तशी विनंती आम्ही फडणवीस यांना केली आहे. आम्हाला आशा आहे की ते आमची विनंती मान्य करतील," असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :

मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती

Devendra Fadnavis: खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget