एक्स्प्लोर

Assembly Election 2022 : पाचपैकी चार राज्यात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार, भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास भाजपच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. तसेच 4 राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ उत्तर प्रदेशमधील मतदानाचा एक टप्पा बाकी राहिला आहे. बाकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या ठिकाणची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सहा टप्पे पार पडले असून, एका टप्पा अद्याप बाकी आहे. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला. पंजाबमध्येही भाजपची स्थिती मजबूत होईल, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला मिळाला असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या शेवटच्या फेरीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात शाहा म्हणाले की, भाजपने शास्त्रशुद्ध निवडणूक प्रचार सुरु केला. निवडणुकीच्या प्रचारात बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत भाजप उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल आणि त्याला इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले.

पाच राज्यातील जनतेने भाजपला साथ दिली आहे, असे मी निश्चितपणे सांगू शकतो. ज्या चार राज्यांत भाजपची सत्ता आहे, तेथे भाजपचे पुनरागमन होईल आणि पंजाबमध्ये आमची स्थिती मजबूत होईल.' असे शाह यांनी सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा केला आणि राज्यात प्रथमच लोकशाही तळागाळात फोफावत असल्याचे शाह म्हणाले. 

उत्तर प्रदेशमध्ये काही नेत्यांनी पक्ष सोडला पण मतदारांनी भाजपला सोडले नाही. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने 2017 च्या निवडणुकीत दिलेल्या 92.6 टक्क्यांहून अधिक आश्वासनांची पूर्तता केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या योजना राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवल्या असल्याचे शाह म्हणाले. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि भटकी जनावरे यांसारख्या मुद्द्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत विचारले असता शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे गरीबांना आशा निर्माण झाली आहे की जनतेचे जीवनमान चांगले होईल. जवळपास साडेसात वर्षे देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सुरु आहे. 

दरम्यान, पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे. पंजाबमध्ये भाजपला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भाजप पंजाबमध्ये प्रथमच 65 पेक्षा जास्त जागा लढवत आहे. आम्हाला तेथे खूप सकारात्मक जनसमर्थन मिळाले आहे आणि आम्ही तेथे अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवू असे नड्डा यावेळी म्हणाले.

पंजाबमध्ये भाजपची शिरोमणी अकाली दलाशी युती होती. मात्र, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून ही युती तुटली. भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तर उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यात. पाच राज्यांतील मतमोजणी एकाच वेळी 10 मार्च रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्पकडून इकडं राष्ट्राध्यक्षांविरोधात 435 कोटींचे बक्षीस अन् तीन युद्धनौका पाठवल्या, तिकडं झुकणार नाही म्हणत छोट्या देशाकडून युद्धनौकांविरुद्ध 45 लाख सैनिक तैनात
ट्रम्पकडून इकडं राष्ट्राध्यक्षांविरोधात 435 कोटींचे बक्षीस अन् तीन युद्धनौका पाठवल्या, तिकडं झुकणार नाही म्हणत छोट्या देशाकडून युद्धनौकांविरुद्ध 45 लाख सैनिक तैनात
नितेश राणेंना पूर्वजांची आठवण, वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी; सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार
नितेश राणेंना पूर्वजांची आठवण, वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी; सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार
सिंहगडावरील तानाजी कड्यावरुन युवक दरीत कोसळला; हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आलेला ग्रुप
सिंहगडावरील तानाजी कड्यावरुन युवक दरीत कोसळला; हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आलेला ग्रुप
मोठी बातमी! राज्यभरातील ZP महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ, आता वसुली होणार, किती जणींनी पैसे लाटले?
मोठी बातमी! राज्यभरातील ZP महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ, आता वसुली होणार, किती जणींनी पैसे लाटले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पकडून इकडं राष्ट्राध्यक्षांविरोधात 435 कोटींचे बक्षीस अन् तीन युद्धनौका पाठवल्या, तिकडं झुकणार नाही म्हणत छोट्या देशाकडून युद्धनौकांविरुद्ध 45 लाख सैनिक तैनात
ट्रम्पकडून इकडं राष्ट्राध्यक्षांविरोधात 435 कोटींचे बक्षीस अन् तीन युद्धनौका पाठवल्या, तिकडं झुकणार नाही म्हणत छोट्या देशाकडून युद्धनौकांविरुद्ध 45 लाख सैनिक तैनात
नितेश राणेंना पूर्वजांची आठवण, वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी; सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार
नितेश राणेंना पूर्वजांची आठवण, वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी; सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार
सिंहगडावरील तानाजी कड्यावरुन युवक दरीत कोसळला; हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आलेला ग्रुप
सिंहगडावरील तानाजी कड्यावरुन युवक दरीत कोसळला; हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आलेला ग्रुप
मोठी बातमी! राज्यभरातील ZP महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ, आता वसुली होणार, किती जणींनी पैसे लाटले?
मोठी बातमी! राज्यभरातील ZP महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ, आता वसुली होणार, किती जणींनी पैसे लाटले?
Raju Shetti on Toll: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजू शेट्टींचा पुण्यापासून बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला कडाडून विरोध; म्हणाले; वसूली तातडीनं बंद न केल्यास..
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजू शेट्टींचा पुण्यापासून बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला कडाडून विरोध; म्हणाले; वसूली तातडीनं बंद न केल्यास..
Raj Thackeray Dog in Press conference: पत्रकार परिषद सुरु असताना राज ठाकरेंनी अचानक हाक मारली, ए पिल्लू....इकडे ये!
पत्रकार परिषद सुरु असताना राज ठाकरेंनी अचानक हाक मारली, ए पिल्लू....इकडे ये!
Raigad Boat Mishap Drown: उरणच्या खोल समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाली, बचावकार्य सुरु
Raigad Boat Mishap Drown: उरणच्या खोल समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाली, नौदलाची बचाव मोहीम
शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
Embed widget