एक्स्प्लोर

Assembly Election 2022 : पाचपैकी चार राज्यात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार, भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास भाजपच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. तसेच 4 राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ उत्तर प्रदेशमधील मतदानाचा एक टप्पा बाकी राहिला आहे. बाकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या ठिकाणची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सहा टप्पे पार पडले असून, एका टप्पा अद्याप बाकी आहे. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला. पंजाबमध्येही भाजपची स्थिती मजबूत होईल, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला मिळाला असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या शेवटच्या फेरीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात शाहा म्हणाले की, भाजपने शास्त्रशुद्ध निवडणूक प्रचार सुरु केला. निवडणुकीच्या प्रचारात बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत भाजप उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल आणि त्याला इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले.

पाच राज्यातील जनतेने भाजपला साथ दिली आहे, असे मी निश्चितपणे सांगू शकतो. ज्या चार राज्यांत भाजपची सत्ता आहे, तेथे भाजपचे पुनरागमन होईल आणि पंजाबमध्ये आमची स्थिती मजबूत होईल.' असे शाह यांनी सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा केला आणि राज्यात प्रथमच लोकशाही तळागाळात फोफावत असल्याचे शाह म्हणाले. 

उत्तर प्रदेशमध्ये काही नेत्यांनी पक्ष सोडला पण मतदारांनी भाजपला सोडले नाही. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने 2017 च्या निवडणुकीत दिलेल्या 92.6 टक्क्यांहून अधिक आश्वासनांची पूर्तता केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या योजना राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवल्या असल्याचे शाह म्हणाले. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि भटकी जनावरे यांसारख्या मुद्द्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत विचारले असता शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे गरीबांना आशा निर्माण झाली आहे की जनतेचे जीवनमान चांगले होईल. जवळपास साडेसात वर्षे देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सुरु आहे. 

दरम्यान, पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे. पंजाबमध्ये भाजपला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भाजप पंजाबमध्ये प्रथमच 65 पेक्षा जास्त जागा लढवत आहे. आम्हाला तेथे खूप सकारात्मक जनसमर्थन मिळाले आहे आणि आम्ही तेथे अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवू असे नड्डा यावेळी म्हणाले.

पंजाबमध्ये भाजपची शिरोमणी अकाली दलाशी युती होती. मात्र, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून ही युती तुटली. भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तर उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यात. पाच राज्यांतील मतमोजणी एकाच वेळी 10 मार्च रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Pune : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
Pune : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
Gokul Election : कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार
कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Embed widget