एक्स्प्लोर

Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश

Bihar Vidhansabha Result बिहार विधानसभा निवडणुकांध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत एनडीए आघाडीला मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई : बिहार विधानसभा (Bihar vidhansabha) निवडणुकांच्या निकालात भाजप एनडीएने मोठा विजय मिळवला असून भाजपच (BJP) मोठा भाऊ ठरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजप, जयदू, एलजेपी, एचएएम आणि आरएलएम या 5 पक्षांची एनडीए आघाडी होती. एनडीएमधील सर्वच पक्षांना गत 2020 च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील 243 जागांपैकी यंदा भाजप आणि जदयूने (JDU) 102 जागांवर उमेदवार मैदानात उतरवले होते. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्तीने 29 उमेदवारांना तिकीट दिले. तसेच, हिंदुस्तानी आवाम मोर्चाने 6 आणि आरएलएमने 4 उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये, एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचे दिसते. त्यामध्ये, भाजप 91 तर नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या जदयूला 79 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते.

बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- (Bihar Total Voting) बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकांध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत एनडीए आघाडीला मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, भाजप आणि नितीश कुमार यांच्या राजद पक्षाने विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तर, काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या राजदमध्ये पराभवाचा लवलेश दिसून येत आहे. काँग्रेस महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 143 जागा लढवल्या तर काँग्रेसने 60, सीपीआय माले-20, व्हिआयपी 11, सीपीआय 6 आणि सीपीएमने 4 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, महागठबंधनला अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट भाजप एनडीए आघाडीने मोठा विजय मिळवला आहे.

गत 2020 च्या निवडणुकीत केवळ 43 जागा

बिहार विधानसभा निवडणुकीत गत 2020 मध्ये नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 74 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा 2025 च्या निवडणुकीत जदयूला 80 जागांवर आघाडी दिसून येत आहे. म्हणजेच गत निवडणुकीपेक्षा 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर, भाजपला 95 जागांवर विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीए आघाडीने गत निवडणुकीत 243 पैकी 125 जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये, हिंदुस्तानी आवाम मोर्चा 4 आणि विकासशील इंसान मोर्चाने 4 जागांवर विजय मिळवला होता. यंदाही भाजप एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचं दिसून येत आहे.  

बिहार 2020 निवडणूक निकाल

भाजप आघाडी - 243 पैकी 125

काँग्रेस आघाडी - 243 पैकी 110

महालोकतांत्रिक

सेक्युलर मोर्चा - 243 पैकी 6

लोकजनशक्ती पार्टी - 135 पैकी 1

अपक्ष - 1

पक्षनिहाय निकाल 2020

भाजप - 74

जदयू - 43

लोकजनशक्ती - 1

राजद - 75

काँग्रेस - 19

भाकप माले - 12

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन - 5

भाकप - 2

भाकप मार्क्सवादी - 2

बसप - 1

अपक्षा - 1

हेही वाचा

बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget