एक्स्प्लोर

Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश

Bihar Vidhansabha Result बिहार विधानसभा निवडणुकांध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत एनडीए आघाडीला मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई : बिहार विधानसभा (Bihar vidhansabha) निवडणुकांच्या निकालात भाजप एनडीएने मोठा विजय मिळवला असून भाजपच (BJP) मोठा भाऊ ठरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजप, जयदू, एलजेपी, एचएएम आणि आरएलएम या 5 पक्षांची एनडीए आघाडी होती. एनडीएमधील सर्वच पक्षांना गत 2020 च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील 243 जागांपैकी यंदा भाजप आणि जदयूने (JDU) 102 जागांवर उमेदवार मैदानात उतरवले होते. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्तीने 29 उमेदवारांना तिकीट दिले. तसेच, हिंदुस्तानी आवाम मोर्चाने 6 आणि आरएलएमने 4 उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये, एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचे दिसते. त्यामध्ये, भाजप 91 तर नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या जदयूला 79 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते.

बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- (Bihar Total Voting) बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकांध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत एनडीए आघाडीला मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, भाजप आणि नितीश कुमार यांच्या राजद पक्षाने विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तर, काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या राजदमध्ये पराभवाचा लवलेश दिसून येत आहे. काँग्रेस महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 143 जागा लढवल्या तर काँग्रेसने 60, सीपीआय माले-20, व्हिआयपी 11, सीपीआय 6 आणि सीपीएमने 4 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, महागठबंधनला अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट भाजप एनडीए आघाडीने मोठा विजय मिळवला आहे.

गत 2020 च्या निवडणुकीत केवळ 43 जागा

बिहार विधानसभा निवडणुकीत गत 2020 मध्ये नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 74 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा 2025 च्या निवडणुकीत जदयूला 80 जागांवर आघाडी दिसून येत आहे. म्हणजेच गत निवडणुकीपेक्षा 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर, भाजपला 95 जागांवर विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीए आघाडीने गत निवडणुकीत 243 पैकी 125 जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये, हिंदुस्तानी आवाम मोर्चा 4 आणि विकासशील इंसान मोर्चाने 4 जागांवर विजय मिळवला होता. यंदाही भाजप एनडीए आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचं दिसून येत आहे.  

बिहार 2020 निवडणूक निकाल

भाजप आघाडी - 243 पैकी 125

काँग्रेस आघाडी - 243 पैकी 110

महालोकतांत्रिक

सेक्युलर मोर्चा - 243 पैकी 6

लोकजनशक्ती पार्टी - 135 पैकी 1

अपक्ष - 1

पक्षनिहाय निकाल 2020

भाजप - 74

जदयू - 43

लोकजनशक्ती - 1

राजद - 75

काँग्रेस - 19

भाकप माले - 12

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन - 5

भाकप - 2

भाकप मार्क्सवादी - 2

बसप - 1

अपक्षा - 1

हेही वाचा

बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
Embed widget