एक्स्प्लोर

Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?

Bihar Election: बिहार निवडणुकीतील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए मजबूत स्थितीत असल्याचे दिसून आले आहे, जेडीयू सुमारे ८१ जागांवर आघाडीवर आहे.

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या प्रारंभिक कल समोर येत आहेत. या कलांनुसार मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांची मजबुत पकड पुन्हा एकदा स्पष्ट होत असून त्यांची पार्टी जनता दल (युनायटेड) साधारण ८१ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, जेडीयूने सोशल मीडियावर नीतीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा संकेत देणारी पोस्ट टाकली होती. पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर त्यांचा फोटो शेअर करत कॅप्शन देण्यात आले होते— “न भूतो न भविष्यति… नीतीश कुमार बिहार के मुख्यमंत्री थे, हैं और रहेंगे.” मात्र ही पोस्ट काही वेळानंतर हटवण्यात आली. यापूर्वीही पटण्यातील पक्ष मुख्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरवर एका समर्थकाने लिहिले होते, “टायगर अभी जिंदा है.”(Nitish Kumar)


Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?

Bihar Election: निवडणुकीपूर्वी नीतीश कुमार ‘आजारी’ असल्याची चर्चा

मतदानापूर्वी नीतीश कुमार आजारी आहेत, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही, अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र मतदान संपताच त्यांनी घेतलेला सक्रिय पवित्रा एनडीए पॅनलमध्ये वेगळा संदेश देणारा ठरला असून आता ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Bihar Election: सध्या काय कल आहेत?

दुपारी सव्वा एकपर्यंतच्या कलांनुसार एनडीए आघाडीमध्ये जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर हे कल निकालात बदलले तर जेडीयू अंदाजे ८० जागा जिंकू शकते. बीजेपी सध्या ‘मोठा भाऊ’ ठरल्यासारखा दिसत असून ९० जागांवर आघाडीवर आहे. एनडीएमधील चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपीलाही २१ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर इतर सहयोगी पक्ष सुमारे सात जागांवर आगेकूच करत आहेत.

Bihar Election:  बिहारच्या निकालावर देवाभाऊची छाप

बिहारमधील 61 मतदारसंघांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा प्रभाव पडला. बिहारमधील 61 मतदारसंघापैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जिल्ह्यात काही मतदारसंघात प्रचार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली केल्या होत्या. दरम्यान, मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जल्लोष केला जाणार आहे. 

2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Result 2020)

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget