एक्स्प्लोर

अब की बार पीएम मोदींच्या कामगिरीवर जनता किती समाधानी? ओपिनियन पोलमधून धक्कादायक खुलासा

Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आल्या आहेत. भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आल्या आहेत. तीन ते चार महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यादरम्यान सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलेय. यामध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या (PM modi) कामकाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आलाय. या ओपिनियन पोलमध्ये बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राज्यस्थान, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यात सर्वेक्षण करण्यात आलेय. 

ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील 47 टक्के नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाशी समाधानी आहेत. तर 30 टक्के लोक कमी समाधानी आहेत. 21 टक्के नागरिक मोदींच्या कामाशी समाधानी नाहीत. दोन टक्के लोकांनी याबाबत कोणतेही मत दिले नाही. 

छत्तीसगड आणि बिहारमधील लोकांचा कौल काय  ?

छत्तीसगडमधील लोकांनी या प्रश्नाला उत्तर देताना  पंतप्रधानांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. छत्तीसगडमध्ये 54 टक्के लोकांनी मोदींच्या कामकाजावर समाधानी असल्याचे सांगितले. 26 टक्के कमी समाधानी आहेत, तर 20 टक्के असमाधानी आहेत.

बिहारमधील 57 टक्के लोक मोदींच्या कामामुळे समाधानी आहेत, 22 टक्के कमी समाधानी आहेत आणि 20 टक्के लोक पंतप्रधानांच्या कामावर असमाधानी आहेत. तर 1 टक्के लोकांनी यावर मत मांडणं टाळलं. 

राजस्थान अन् मध्य प्रदेशमधील लोकांचं काय म्हणणं? 

राजस्थानमधील 56 टक्के लोक पंतप्रधानांच्या कामावर समाधानी आहेत. तर 25 टक्के लोक मोदींच्या कामावर कमी समाधानी आहेत. 19 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे सांगितलेय.  मध्य प्रदेशातील 55 टक्के लोक पंतप्रधानांच्या कामावर समाधानी आहेत, 26 टक्के लोक कमी समाधानी आहेत. तर 19 टक्के असमाधानी आहेत.

उत्तर प्रदेशमधील काय स्थिती ?

मोदींच्या कामावर समधानी आहात का? या प्रश्नाच्या उत्तरात उत्तर प्रदेशातील 48 टक्के लोकांनी समाधानी असल्याचे सांगितले. 27 टक्के लोक कमी समाधानी आहेत. तर 25 टक्के लोक असमाधानी आहेत.  

पंतप्रधान मोदी की राहुल ? डायरेक्ट पंतप्रधान कोण?

डायरेक्ट पंतप्रधान म्हणून निवडायचं झाल्यास कुणाला निवडाल.. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाली. उत्तर प्रदेशमधील 60 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना पसंती दर्शवली. तर 30 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने कौल दिलाय. दोघेही नको म्हणून आठ टक्के लोकांनी मत नोंदवली. तर दोन टक्के नागरिकांनी यावर उत्तर देणं टाळलं. 

टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील  लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget