एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि वर्धा या सात मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या सातही जागा युतीने जिंकल्या होत्या.
![महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती? 2014 Loksabha Results Of Nagpur, Gadchiroli, Bhandara Gondia, Chandrapur, Wardha, Yavatmal महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/09142949/vidharb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि वर्धा या सात मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या सातही जागा युतीने जिंकल्या होत्या.
नागपूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरात 57.12 टक्के मतदान झालं होतं. 19 लाख मतदारांपैकी 10 लाख 85 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपच्या नितीन गडकरींना 5 लाख 87 हजार 767 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांना 3 लाख मतं मिळाली होती. गडकरी तब्बल 2 लाख 85 हजार मतांनी विजयी झाले होते.
भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदियात तब्बल 72.31 टक्के मतदान झालं होतं. 16.50 लाख मतदारांपैकी 11 लाख 97 हजार 398 मतदारांनी मतदान केलं. त्यावेळी भाजपकडून लढणाऱ्या नाना पटोलेंनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना दीड लाख मतांनी हरवलं होतं. पटोलेंना 6 लाख 6 हजार मतं मिळाली होती तर प्रफुल पटेलांना 4 लाख 56 हजार मतं मिळाली होती.
गडचिरोली-चिमूर : या मतदारसंघात 14 लाख 68 हजार मतदारांपैकी 70.04 टक्के म्हणजेचे 10 लाख 28 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपचे अशोक नेते यांनी काँगेसच्या नामदेव उसेंडी यांचा 2 लाख 35 हजार मतांनी हरवलं होतं.
चंद्रपूर : मतदारसंघात 63.29 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 53 हजारांपैकी 11 लाख मतदारांनी मतदानाचा हक्कं बजावला होता. भाजपचे हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळे यांचा 2 लाख 36 हजार मतांनी पराभव केला होता.
यवतमाळ-वाशिम : 58.87 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 55 हजार मतदारांपैकी 10 लाख 33 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा 1 लाख 7 हजार मतांनी पराभव केला होता.
रामटेक : या मतदारसंघात 62.64 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 77 हजार मतदारांपैकी 10 लाख 50 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे कृपाल तुमाने 1 लाख 75 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 5 लाख 19 हजार तर काँगेसच्या मुकुल वासनिक यांना 3 लाख 44 हजार मतं मिळाली होती.
वर्धा : या मतदार संघात 64.79 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 64 हजार मतदारांपैकी 10 लाख 13 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या रामदास तडस यांना 5 लाख 37 हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सागर मेघेंना 3 लाख 21 हजार मतं मिळाली होती. तडस 2 लाख 15 हजार मतांनी जिंकले होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)