एक्स्प्लोर

दंगल घडवून तडीपार गुंडाकडून एकाची हत्या; नाशिकमध्ये खळबळ

एका हत्येच्या घटनेने नाशिक सध्या हादरून गेलं आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी रात्री तडीपार गुंड विशाल बैनवालने आपल्या साथीदारांच्या मदतीने हातात धारदार शस्त्रे मिरवत दंगल घडवून आणली.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुहेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं आहे. नाशिकमधील भद्रकाली परिसरात उठलेली दंगल आणि तडीपार गुंडाने केलेली हत्या, यांमुळे आता आता नाशकात पोलीस आपलं काम चोख बजावत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता असा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून केला जातोय.

एका हत्येच्या घटनेने नाशिक सध्या हादरून गेलं आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी रात्री तडीपार गुंड विशाल बैनवालने आपल्या साथीदारांच्या मदतीने हातात धारदार शस्त्रे मिरवत दंगल घडवून आणली. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे, जुन्या भांडणाचा राग मनात धरत तसेच पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरून आकाश रजवे आणि करण लोट यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. आकाशच्या पोटात, मानेवर या टोळीने धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्यानंतर तिथून पळ काढला. आकाश रक्ताच्या थारोळ्यात सापडला आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. तर आकाशचा मित्र करणही यामध्ये गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. तर मयताच्या नातेवाईकांनी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

विशेष म्हणजे पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती तर आकाशचा जीव वाचला असता, आरोप आता आकाशच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. कारण काही गुंडांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन मारहाण केल्याबाबत मृत आकाश आणि त्याच्या मित्रांनी घटनेच्या दीड तासापूर्वीच भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकूण 9 आरोपींविरोधात हत्या, हत्येचा कट, दंगल, प्राणघातक हल्ला आणि धारदार शस्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यातील 6 जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर तडीपार गुंड विशाल बैनवालसह 2 जण फरार आहेत. जुलै 2019 पासून विशालला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र तडीपार असूनही त्याचा शहरात वावर कसा? तसेच हा गुंड सडेआम दहशत माजवत असतांनाच पोलीस कुठे होते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात प्राणघातक हल्ले, मारहाण, घरफोडीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आणि त्यातच आता असे प्रकार समोर येत असतील तर अशा गुंडांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळणे गरजेच आहे. नाहीतर नाशिकचे नागपूर होण्यास वेळ लागणार नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget