Mumbai Crime :कुशीनगर एक्सप्रेसच्या बाथरुममधील कचराकुंडीत चक्क 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला; गोरखपूरकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये काय घडलं?
Mumbai Crime News : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोच बी-2 च्या बाथरूममध्ये कचराकुंडीत 7-8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आलाय.

Mumbai Crime News : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कुशीनगर एक्सप्रेसच्या (Kushinagar Superfast Express) (ट्रेन क्रमांक 22537) एसी कोच बी-2 च्या बाथरूममध्ये कचराकुंडीत 7-8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आलाय. शुक्रवारी (22 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हि घटना उघडकीस आलीय. घटनेची माहिती मिळतच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे.
ट्रेनच्या साफसफाई दरम्यान कचराकुंडीत दिसून आला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.5 वाजताच्या सुमारास कुशीनगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचली. ही ट्रेन येथून परत येते आणि काशी एक्सप्रेस (१५०१७) म्हणून पुढे जाते. अशातच, ट्रेनच्या साफसफाई दरम्यान, स्वच्छता प्रभारींनी बाथरूममध्ये डोकावले असता यावेळी कचराकुंडीत एका निष्पापाचा मृतदेह त्यांना दिसून आला.
त्यांनतर त्याने ताबडतोब दुपारी 1.50 वाजताच्या सुमारास स्टेशन व्यवस्थापकांना याची माहिती दिली. त्यानंतर, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या घटनेचा तपास सुरू असून घटनेशी संबंधित प्रत्येक पैलूची पोलीस चौकशी करत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच संपूर्ण तपशीलवार अहवाल पाठवला जाईल. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मात्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिवंडी शहरात खड्ड्यामुळे डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू
भिवंडी शहरात खड्ड्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली असून रात्रीचा सुमारास एका डॉक्टरचा खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पूर्वीही सिराज हॉस्पिटलच्या समोर अशी घटना घडली होती. तेव्हा तेथील स्टाफ ने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील डॉक्टर निरुद्दीन अन्सारी यांनी या रस्त्यांसंदर्भात बोलताना सांगितले की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहेत आणि रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. महानगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे तातडीने लक्ष घालून येथील नागरिकांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून मोकळा करावं, अशी मागणी आता त्यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























