एक्स्प्लोर

Baba Siddique Death Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर शुटर तिथेच थांबला होता, पोलिसांच्या डोळ्यांसमोर असूनही..... तपासात खळबळजनक खुलासा

Baba Siddique Death Case: शिवकुमार गौतमनं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिष्णोई गँगनं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याचं काम दिलं होतं, असंही त्यानं सांगितलं.

Baba Siddique Death Case: अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नव्यानं अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाचजणांत शिवकुमार गौतम (Shivkumar Gautam) उर्फ शिवा या मुख्य शूटरचाही समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष पथकानं या पाचजणांना परराज्यांमधून अटक केली आहे. त्या पाच आरोपींना सोमवारी मुंबईतल्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मुख्य शूटर शिवकुमार गौतमला रविवारी बहराइचमधून अटक करण्यात आलेली. शिवकुमार गौतमनं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिष्णोई गँगनं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याचं काम दिलं होतं. अनमोल बिष्णोईनं त्याला आधी जे टार्गेट येईल, त्याला गोळ्या घालण्याची सूचना केली होती, असंही त्यानं सांगितलं. 

शिवकुमार गौतमनं पुढे बोलताना सांगितलं की, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर त्यांची योजना उज्जैनला, नंतर वैष्णोदेवीला आणि शेवटी परदेशात पळून जाण्याची होती, पण ही योजना यशस्वी झाली नाही. मुंबईतून पळून जात असताना झारखंडला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या फोनवरून त्यानं सहआरोपी अनुराग कश्यपशी संपर्क साधला होता, असंही गौतमनं सांगितलं. हत्येपूर्वी आणि नंतर गौतमचे शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्याशी नियमित बोलणं होतं.

बाबा सिद्दिकींची हत्येनंतर कपडे बदलून हत्यारा तिथेच उभा होता... 

शिवकुमार गौतमच्या चौकशीदरम्यान सांगितलं की, 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी तात्काळ तिथून फरार झाला नाही. याव्यतिरिक्त त्यानं आपले कपडे बदलले आणि त्यानंतर बराच वेळ घटनास्थळावर सुरू असलेला हंगामा पाहत होता. 

मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गौतमनं चौकशीत पुढे सांगितलं की, गोळी मारल्यानंतर त्यानं थोडं लांब जाऊन शर्ट बदललं आणि तिथे जमा झालेल्या गर्दीत घुसला. त्याला कुणी ओळखू नये म्हणून त्यानं असं केल्याचं चौकशीत सांगितलं आहे. तो तिथे होता, याबाबत त्यावेळी मुंबई पोलिसांना काहीच माहिती नव्हती. त्यानंतर तो रिक्षानं कुर्ला स्टेशनला पोहोचला. तिथून लोकलनं ठाण्याला गेला. पुढे ठाणा स्टेशनवरुन त्यानं एक एक्सप्रेस गाडी पकडली आणि पहाटे 3 च्या सुमारास पुण्याला पोहोचला. तिथे त्यानं आपला मोबाईल फेकून दिला. 

आरोपीनं चौकशीत सांगण्यानुसार, पुण्यात तो तब्बल सात दिवस राहिला, नंतर तिथून ट्रेननं झाशीला गेला आणि तिथे पाच दिवस राहिल्यानंतर लखनौला पोहोचला. लखनौमध्ये त्यानं एक नवा मोबाईल खरेदी केला आणि आपल्या साथीदारांशी संपर्क साधला. लखनौमध्ये 11 दिवस राहिल्यानंतर पाच दिवसांआधीच तो बहराइचला पोहोचला. जिथे त्याच्या साथीदारांनी जवळच्याच एका गावात त्याच्यासाठी सुरक्षित ठिकाणाची व्यवस्था केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमनं मुंबईहून बहराइचपर्यंतचा प्रवास सार्वजनिक वाहानानं केला. बिष्णोई गँगनं त्याला सांगितल्यानुसार, तो बहराइचहून 10 नोव्हेंबरला नेपाळला पळून जाण्याचा प्लान रचत होता. 

अनमोल बिश्नोईनं शिवकुमार गौतमचं मनोबल वाढवलं

आरोपी शिवकुमार गौतम यानं पोलिसांना सांगितलं की, बाबा सिद्दिकींची हत्या करण्यापूर्वी त्याचं अनमोल बिष्णोईशी बोलणं झालं होतं आणि यादरम्यान अनमोलनं त्याचं मनोबल वाढवलं ​​होतं. खून करण्यापूर्वी अनमोल बिश्नोईनं शूटर गौतमला सांगितलं होतं की, तो जे काही करणार आहे ते देव आणि समाजासाठी आहे. त्यामुळे त्यांनी न घाबरता हे काम पूर्ण करावं.

क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी सांगितलं की, गौतमनं चौकशीदरम्यान सांगितलं आहे की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. हत्येनंतर तो व्हीओआयपी कॉलद्वारे त्याच्या साथीदारांशी बोलायचा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget