एक्स्प्लोर

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असताना जिओ विरुद्ध एअरटेल, व्होडाफोन-आयडीया वाद ट्रायच्या दारात

टेलिकॉम कंपन्या व्होडोफोन-आयडीया, एअरटेल विरोधात रिलायन्स जिओने ट्रायकडे धाव घेतली आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून खोटा प्रचार करत असल्याचा आरोप जिओने या कंपन्यांवर लावला आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला पत्र लिहून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. टेलिकॉम सेक्रेटरी एस के गुप्ता यांना जियोने लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जियोने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलवर आरोप करत म्हटलं आहे की, दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.

जिओने पत्रात आरोप केले आहेत की, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतातातील विविध भागांतील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या संतापाचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. रिलायन्स जियोचं म्हणणं आहे की, यापूर्वी 28 सप्टेंबर, 2020 मध्येच जिओने ट्रायला एक पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. परंतु असे असूनही या दोन्ही कंपन्यांनी कायदा असल्याचे भासवून आपली नकारात्मक प्रसिद्धी कायम ठेवली आहे.

रिलायन्स जिओने आरोप केला आहे की, या दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचं आपले कर्मचारी, एजंट्स आणि रिटेलर्समार्फत रिलायन्सच्या विरोधात नेगेटिव्ह कॅम्पेन सुरु आहे. ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने अमिष दाखवून जियोमधून पोर्ट करुन स्वतःकडे आणण्याचा या कंपन्या प्रयत्न करत आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना कशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुरावे म्हणून रिलायन्स जिओने ट्रायकडे सोपावले आहेत.

व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल स्वतःला शेतकरी समर्थक आणि रिलायन्स जियोला शेतकरी विरोधी सांगून आंदोलन आणखी चिघळवण्याचं काम करत आहेत. रिलायन्स जिओने आरोप लावले आहेत की, दोन्ही कंपन्यांनी संपूर्ण देशात जिओ विरोधात खोटा प्रचार करण्याचं काम करत आहेत. यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांच्या मनातील प्रतिमेला नुकसान पोहोचत आहे.

एअरटेलचं मत काय?

जिओने केलेल्या तक्रारीवर एअरटेलने जियोने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलचं म्हणणं आहे की, एअरटेलने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षांपर्यंत ग्राहकांना सेवा पुरवली आहे. या दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा नेहमीच सन्मान केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सRajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 13 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सLadka Bhau Yojana Sangli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी काय? सांगलीत मेळवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर, Fact Checkमध्ये काय आढळलं? 
Fact Check : 26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
Supreme Court on EVM : डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
Embed widget