एक्स्प्लोर

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असताना जिओ विरुद्ध एअरटेल, व्होडाफोन-आयडीया वाद ट्रायच्या दारात

टेलिकॉम कंपन्या व्होडोफोन-आयडीया, एअरटेल विरोधात रिलायन्स जिओने ट्रायकडे धाव घेतली आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून खोटा प्रचार करत असल्याचा आरोप जिओने या कंपन्यांवर लावला आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला पत्र लिहून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. टेलिकॉम सेक्रेटरी एस के गुप्ता यांना जियोने लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जियोने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलवर आरोप करत म्हटलं आहे की, दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.

जिओने पत्रात आरोप केले आहेत की, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतातातील विविध भागांतील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या संतापाचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. रिलायन्स जियोचं म्हणणं आहे की, यापूर्वी 28 सप्टेंबर, 2020 मध्येच जिओने ट्रायला एक पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. परंतु असे असूनही या दोन्ही कंपन्यांनी कायदा असल्याचे भासवून आपली नकारात्मक प्रसिद्धी कायम ठेवली आहे.

रिलायन्स जिओने आरोप केला आहे की, या दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचं आपले कर्मचारी, एजंट्स आणि रिटेलर्समार्फत रिलायन्सच्या विरोधात नेगेटिव्ह कॅम्पेन सुरु आहे. ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने अमिष दाखवून जियोमधून पोर्ट करुन स्वतःकडे आणण्याचा या कंपन्या प्रयत्न करत आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना कशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुरावे म्हणून रिलायन्स जिओने ट्रायकडे सोपावले आहेत.

व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल स्वतःला शेतकरी समर्थक आणि रिलायन्स जियोला शेतकरी विरोधी सांगून आंदोलन आणखी चिघळवण्याचं काम करत आहेत. रिलायन्स जिओने आरोप लावले आहेत की, दोन्ही कंपन्यांनी संपूर्ण देशात जिओ विरोधात खोटा प्रचार करण्याचं काम करत आहेत. यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांच्या मनातील प्रतिमेला नुकसान पोहोचत आहे.

एअरटेलचं मत काय?

जिओने केलेल्या तक्रारीवर एअरटेलने जियोने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलचं म्हणणं आहे की, एअरटेलने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षांपर्यंत ग्राहकांना सेवा पुरवली आहे. या दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा नेहमीच सन्मान केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget