एक्स्प्लोर

Medicine Check From QR: बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य

Bar Codes on Medicines: बनावट औषधांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि खरेदीदाराला संपूर्ण माहिती पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आज 1 ऑगस्टपासून हा नियम लागू होणार आहे.

Medicine Check From QR: आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात भिती असते की, आपण जी औषधं घेतोय ती बनावट तर नाहीत? पण आता हीच भिती दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज 1 ऑगस्ट 2023 पासून केंद्र सरकारनं 300 हून अधिक औषधांवर क्युआर कोड लावण्याचे आदेश जारी केले आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) नं तसे आदेशच फार्मा कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार देशातील टॉप 300 औषधी ब्रँड्सना त्यांच्या औषधांवर क्युआर कोड(QR Code) किंवा बारकोड (Bar Code) टाकणं अनिवार्य असणार आहे. औषधांवरील बारकोड स्कॅन केल्यानं तुम्हाला तुमच्या औषधांबद्दल महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 

कोणकोणत्या औषधांवर लागणार क्युआर कोड? 

DCGI नं देशातील ज्या टॉप 300 औषधांच्या कंपन्यांना क्यूआर कोड टाकण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्या कंपन्यांमध्ये एलिग्रा, शेलकेल, काल्पोल, डोलो आणि मेफ्टेल यांसारख्या औषधांच्या कंपन्यांच्या समावेश आहे. भारताच्या ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) नं औषध कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, औषधांवर बारकोड किंवा QR कोड टाकले नाहीत, तर मात्र औषध कंपन्यांवर कारवाई केली जाऊन त्यांना मोठा दंडही आकारला जाऊ शकतो.

क्यूआर कोडद्वारे नेमकं काय कळणार?

युनिक प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन कोडद्वारे, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँडचं नाव, उत्पादकाचं नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, औषधाची एक्सपायरी डेट आणि उत्पादकाचा परवाना क्रमांक हे सर्व माहित असणं आवश्यक असणार आहे.

सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला? 

देशात वाढत असलेल्या बनावट औषधांच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी आणि रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारनं असं पाऊल उचलल्याची माहिती दिली होती. त्याअंतर्गत काही काळापूर्वी त्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून, आज, 1 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी, सरकारनं औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं कायदा 1940 मध्ये सुधारणा केली आहे आणि त्याद्वारे औषध कंपन्यांना त्यांच्या ब्रँडवर H2/QR लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

बनावट, कमी दर्जाच्या  API पासून बनवलेल्या औषधांचा रुग्णांना फायदा होत नाही. DTAB म्हणजेच, ड्रग्स टेक्निकल अॅडवायजरी बोर्डनं जून 2019 मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली. अनेक रिपोर्ट्समधून असा दावा करण्यात आला होता की, भारतात तयार केल्या जाणाऱ्या औषधांपैकी 20 टक्के औषधं बनावट आहेत. सरकारी अहवालानुसार, 3 टक्के औषधांचा दर्जा निकृष्ट आहे.

2011 पासूनच ही प्रणाली लागू करण्यासाठी शासन प्रयत्नशील होतं, परंतु फार्मा कंपन्यांनी वारंवार नकार दिल्यामुळे यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. वेगवेगळे सरकारी विभाग वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील, याची काळजी फार्मा कंपन्यांना अधिक होती. त्यामुळे ही प्रणाली लागू करण्यास अधिक वेळ लागला. 

कंपन्यांनी देशभरात एकसमान QR कोड लागू करण्याची मागणी केली, त्यानंतर सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशननं 2019 मध्ये हा मसुदा तयार केला. ज्या अंतर्गत अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (API) साठी QR कोड अनिवार्य करण्याची सूचना करण्यात आली होती.

API म्हणजे काय?

API म्हणजे अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स. इंटरमीडिएट्स, गोळ्या, कॅप्सूल आणि सिरप बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे, API. एपीआय कोणत्याही औषधाच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावतं आणि यासाठी भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
'या' योजनेत करा गुंतवणूक, प्रत्येक तिमाहीत मिळवा 61 हजार 500 रुपयांचे व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती 
'या' योजनेत करा गुंतवणूक, प्रत्येक तिमाहीत मिळवा 61 हजार 500 रुपयांचे व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget