एक्स्प्लोर

Layoff: भारतातील 'या' दिग्गज कंपनीनं उचललं मोठं पाऊल, 700 कर्मचाऱ्यांना झटक्यात दिला नारळ 

अलिकडच्या काळात अनेक IT कंपन्यांमध्ये नोकरकपात केली जात आहे. याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. अशातच आता  Infosys या भारतातील IT क्षेत्रातील कंपनीनं देखील मोठा निर्णय घेतला आहे.

Layoff : अलिकडच्या काळात अनेक IT कंपन्यांमध्ये नोकरकपात केली जात आहे. याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. अशातच आता  Infosys या भारतातील IT क्षेत्रातील कंपनीनं देखील मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमधून सुमारे 700 फ्रेशर्सना कंपनीने काढून टाकले आहे. आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (नाईट्स) यांनी युक्तिवाद केला की या फ्रेशर्सना कंपनीत रुजू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच काढून टाकले आहे.

अवघ्या सहा महिन्यात सोडली कंपनी 

पदवीनंतर दोन वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये इन्फोसिससोबत काम करण्याची संधी मिळली. पण केवळ सहा महिन्यांत ती नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळं हा कंपनीत काम करत असलेल्या फ्रेशर्ससाठी मोठा धक्का आहे. हे धक्कादायक आणि अनैतिक असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. इन्फोसिसने काही महिन्यांपूर्वीच सुमारे 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अखेर आज हा निर्णय घेतला आहे. दरम्यान याच मुद्द्यावर NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कामगार मंत्र्यांना पत्र लिहून तीन मागण्या केल्या आहेत.

औद्योगिक विवाद कायदा, 1947 चे उल्लंघन केल्यामुळे, इन्फोसिसवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात यावी.

कायदेशीर तपास पूर्ण होईपर्यंत पुढील टाळेबंदी रोखण्यात यावी.

काढून टाकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भरपाईसह पुन्हा कामावर घेण्याची मागणी.

NITES ने इन्फोसिसवर आरोप

NITES ने आरोप केला आहे की कंपनीने टर्मिनेशन प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना धमकवण्यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात केले आहेत. याबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ट्वीटरवर एकाने आपला राग व्यक्त केला, हे धक्कादायक आहे. इन्फोसिसकडून त्यांची ऑफर लेटर मिळाल्यानंतर, या फ्रेशर्सनी 2 ते 2.5 वर्षे वाट पाहिली आणि शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीत रुजू झाले. होते. आता अवघ्या सहा महिन्यांनंतर यातील 700 लोकांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. 

टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरूच आहे. 2024 मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. इंटेल, टेस्ला, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मिळून जवळपास एक लाख 49 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेस्ला ते इंटेल आणि सिस्को ते मायक्रोसॉफ्टपर्यंत, अनेक कंपन्यांनी पैशांची बचत करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी, बदलत्या बाजाराच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या कामगारांची संख्या कमी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Layoff : झटक्यात गेली 76 लाखांचा पगार असणारी नोकरी, तरीही मुलगी आनंदीच, नेमकं कारण काय? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चांदा ते बांदा, गॅस पाईप पोहोचवणार, सरकारचं धडाकेबाज पाऊल, प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठा कंपन्यांची नावं जाहीर, तुमच्या जिल्ह्यात कोणती कंपनी?
चांदा ते बांदा, गॅस पाईप पोहोचवणार, सरकारचं धडाकेबाज पाऊल, प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठा कंपन्यांची नावं जाहीर, तुमच्या जिल्ह्यात कोणती कंपनी?
इराण-अमेरिका युद्ध लांबल्याने सरकार सावध झालं, गॅस टंचाईचा धोका कायमचा मिटवण्यासाठी मोठा निर्णय, 24 तास युद्धपातळीवर कामाला मंजुरी
इराण-अमेरिका युद्ध लांबल्याने सरकार सावध झालं, गॅस टंचाईचा धोका कायमचा मिटवण्यासाठी मोठा निर्णय, 24 तास कामाला मंजुरी
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
Gold Silver Price Update : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ; एप्रिलच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची वाढ, आजचा सोन्याचा दर काय? वाचा
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ; एप्रिलच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची वाढ, आजचा सोन्याचा दर काय?

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Sunil Tatkare and Sunetra Pawar: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल, तटकरे-पटेलांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी
मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल, तटकरे-पटेलांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Embed widget