एक्स्प्लोर

भारत UAE ला 75 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करणार; निर्यात बंदी असतानाही मोठा निर्णय

संयुक्त अरब अमिराती (UAE) व्यतिरिक्त इतर देश ज्यांना भारत सरकारनं बंदी असतानाही NCEL मार्फत बिगर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. त्यात सिंगापूर, मॉरिशस, भूतान, सेनेगल आणि इंडोनेशियाचाही समावेश आहे.

India To Export 75000 Tonnes Of Non Basmati Rice To UAE: केंद्र सरकारने (Central Government) सोमवारी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (NCEL) मार्फत संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये बिगर बासमती तांदूळ (Non Basmati Rice) निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. सरकारनं 75 हजार टन तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयानं (DGFT) एक अधिसूचना जारी केली आहे आणि या संदर्भात माहिती जारी केली आहे.

तांदळाच्या निर्यातीवर बंदी आल्यानं वाईट परिस्थिती

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारनं सध्या देशात बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये तांदळाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये तर लोकांना बिगर बासमती तांदूळ मिळणंच कठिण झालं होतं. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच, भारताच्या निर्णयानंतर तांदळाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बंदी असतानाही, भारतानं आपल्या मित्रांच्या आणि शेजारी देशांच्या विनंतीनुसार त्यांची अन्न सुरक्षा मागणी पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि काही देशांना बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

UAE व्यतिरिक्त 'या' देशांनाही यापूर्वी भारतानं दिलाय दिलासा

NECL मार्फत 75,000 टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ UAE ला निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं तेथील तांदळाच्या किमतीतही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याआधी मोदी सरकारनं सेनेगलला 5 लाख टन, गांबियाला 5 लाख टन, इंडोनेशियाला 2 लाख टन, मालीला 1 लाख टन आणि भूतानला 48,804 टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली होती.

'या' यादीत भूतान, मॉरिशस आणि सिंगापूरचाही समावेश

UAE व्यतिरिक्त इतरही भारत सरकारनं बंदी असतानाही NCEL द्वारे बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिलेल्या इतर देशांमध्ये शेजारील भूतानचा देखील समावेश आहे. भूतानला 79 हजार टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर मॉरिशसला 14 हजार टन आणि सिंगापूरला 50 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

UAE व्यतिरिक्त 'या' देशांनाही भारताचा दिलासा

NECL मार्फत 75,000 टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ UAE ला निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं तेथील तांदळाच्या किमतीतही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याआधी मोदी सरकारनं सेनेगलला 5 लाख टन, गांबियाला 5 लाख टन, इंडोनेशियाला 2 लाख टन, मालीला 1 लाख टन आणि भूतानला 48,804 टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली होती.

भारताकडून बिगर बासमती निर्यातीवर बंदी का?

देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारनं 20 जुलै रोजी बिगर-बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे, ज्यानं 2022-23 मध्ये तांदळाच्या जागतिक निर्यातीत 40 टक्के योगदान दिलं आहे.

2022-23 मध्ये भारताची एकूण बिगर-बासमती पांढर्‍या तांदळाची निर्यात 42 लाख डॉलर होती, तर गेल्या वर्षी ही निर्यात 26.2 लाख डॉलर इतकी होती. भारत मुख्यत्वे अमेरिका, थायलंड, इटली, स्पेन आणि श्रीलंका या देशांना बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करतो.

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget