एक्स्प्लोर

EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 

EPFO : पीएफ खातेदारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. खातेदारांना दरवर्षी ईपीएफओकडून व्याज दिलं जातं. ईपीएफओकडून रक्कम विविध ठिकाणी गुंतवली जाते.

नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी ठराविक रक्कम ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकडे ठेवली जाते. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून ठराविक रक्कम ईपीएफओकडे जमा केली जाते. या रकमेवर दरवर्षी व्याज दिलं जातं. पीएफ खातेदारांना अधिक व्याज देण्यासाठी ईपीएफओकडून पावलं उचलली जाणार आहेत. 2015 पासून ईपीएफओला इक्विटी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतोय. त्यामुळं पीएफ खातेदारांना व्याजदर वाढवून देण्याबाबत ईपीएफओकडून विचार केला जाऊ शकतो. 

पीएफ खातेदारांना 2024 मध्ये 8.25 टक्के दरानं व्याज देण्यात आलं होतं. तर, ईपीएफओच्या इक्विटी मधील  गुंतवणुकीवर साधारणपणे 9.5 टक्के परतावा मिळत आहे. ईपीएफओची ही गुंतवणूक ईटीएफमधील आहे. पीएफ खातेदारांना 1990 च्या दशकात 10-12 टक्के व्याज मिळालं होतं. 

केंद्रीय श्रम मंत्रालयानं नुकतीच एक अंतर्गत समिती स्थापन केली असून त्यांना इक्विटी गुंतवणुकीतून अधिक परतावा कसा मिळवावा यासाठी पर्याय शोधण्याचं काम देण्यात आलं आहे. ईपीएफओमध्ये जवळपास 7 कोटी 47 लाख खातेदार 2024 मध्ये योगदान देत होते. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये खातेदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

पीएफ खातेदारांना व्याज त्यांच्या दरमहा दिल्या जाणाऱ्या योगदानावर दिलं जातं. मात्र, ते संबंधित आर्थिक वर्षाच्या अखेरिस पीएफ खातेदारांच्या खात्यात वर्ग केलं जातं.


2022-2023 या आर्थिक वर्षात 8.15 टक्के व्याज देण्यात आलं होतं. तर, 2021-2022 या आर्थिक वर्षात 8.10 टक्के व्याज पीएफ खातेदारांना मिळालं होतं. आर्थिक वर्ष 2001-02 मध्ये 10 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात आलं होतं. 2001-02 मध्ये 11 टक्के व्याज देण्यात आलं होतं. 

आम्हाला गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळाल्यास आम्ही पीएफ खातेदारांना अधिक व्याज देऊ, अधिक परतावा मिळवण्यासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवणं, हा चांगला पर्याय आहे, असं एका अधिकाऱ्यानं म्हटलं.   


ईपीएफओनं 15.29 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक 2024 मध्ये इटीएफमध्ये केली आहे. 2015 मध्ये श्रम मंत्रालयानं 5-15 टक्क्यांपर्यंत इक्विटीमधील गुंतवणूक वाढवण्यास मान्यता दिली होती. त्यावर्षी ईपीएफओनं 5 टक्के गुंतवणूक इटीएफमध्ये केली होती.सध्या ती 10 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून 15 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. ईपीएफओकडून 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. 

ईपीएफओकडून केंद्र सरकारच्या सिक्युरीटिजमध्ये 17 टक्के, राज्य विकास कर्जात  46 टक्के, विशेष ठेव योजनांमध्ये 3.5 टक्के, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कॉर्पोरेट बाँडसमध्ये 17.5 , खासगी कॉर्पोरेट बाँडसमध्ये  5 टक्के तर ईटीएफमध्ये 9.5 टक्के गुंतवणूक केली जाते.  

इतर बातम्या :

IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget