एक्स्प्लोर

... तरीही 'एलफिन्स्टन' मुंबईकरांच्या लक्षात राहिल

महाराष्ट्राच्या जनतेवर त्याने उपकार केले आहेत. त्याची आठवण नंतरच्या काळात कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी महाराष्ट्राच्या जनतेला राहील.. अगदी एल्फिन्स्टन स्थानकाचं नामकरण प्रभादेवी झालं असलं तरीही...

“त्यांनी गोडीगुलाबीने प्रजेची मनं राजी केली, त्यांच्यापुढे आलेल्या मोठमोठ्या प्रश्नाचा उदार अंत:करणाने निकाल करुन लोकांना खुष ठेवले. अत्यंत सुधारलेल्या प्रभूने अर्धवट सुधारलेल्या प्रजेचं संगोपन कसे करावे हे पूर्णपणे जाणून मुंबई इलाख्याचे राज्य चालवले. इत्यादी गोष्टी जोपर्यंत लोक आठवतील, तोपर्यंत एल्फिन्स्टन साहेबांचे नाव मागे राहील” -लोकमान्य टिळक, ‘केसरी’ ता. 12 मार्च सन 1895 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि पेशवाईचा प्रदेश मुंबई इलाक्याचा भाग बनला. यानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर म्हणून सूत्रं हातात घेतली. उदारमतवादी, सुसंस्कृत आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून अल्पावधीत त्याने लौकिक मिळवला. भारतीय राज्यव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत त्याने क्रांतिकारी बदल केले. त्यावेळी आपण घेतलेले निर्णय इथल्या जनतेच्या पचनी पडतील याची त्याने पूरेपूर दक्षता घेतली. 19 व्या शतकाच्या प्रारंभी इथे कायदा, सुव्यवस्थेची स्थिती ढासळली होती. सतत होणारी युद्धं, पेंढारी, चोर, दरोडे यामुळे जनता त्रस्त झाली होती. या काळात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणेची त्याने उभारणी केली. त्यामुळे एल्फिन्स्टनच्या काळात ब्रिटीश राजवट म्हणजे ईश्वरी वरदान आहे असं इथल्या जनतेला वाटू लागलं होतं. पेशवाईच्या काळात जमीन महसूलात कमालीची घट झाली होती. एल्फिन्स्टनने जमीन महसूल पद्धतीची पुनर्रचना केली. एल्फिन्स्टनच्या काळात मुंबई प्रांताच्या शिक्षण व्यवस्थेत बरेच बदल झाले. 1823 मध्ये त्याने शिक्षणविषयक नवीन योजना तयार केली. 1824 ला मुंबईत इंजिनिअरींग कॉलेज सुरु झालं. मुंबई इलाख्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने शाळा सुरु करण्यासाठी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. एल्फिन्स्टन हा या संस्थेचा अध्यक्ष आणि मुख्य आधारस्तंभ होता. 1824 ला एल्फिन्स्टन हायस्कूल आणि 1835 ला एल्फिन्स्टन कॉलेज सुरु झालं. महाराष्ट्रातली अनेक नामवंत मंडळी याच शाळा आणि कॉलेजात शिकली. कुणी म्हणतं एल्फिन्स्टनला हे सगळं करण्यामागे भारतीयांचा कळवळा नव्हता.. त्याला इंग्रज प्रशासनासाठी कारकून तयार करायचे होते. हेतू काहीही असो..त्याचं कार्य कसं नाकारता येईल? प्रशासनाच्या सोईसाठी तत्कालीन मुंबई प्रांताचं विभाजन पाच भागात पहिल्यांदा केलं ते एल्फिन्स्टननेच... पुणे, खान्देश, कर्नाटक, अहमदनगर आणि सातारा हे ते प्रांत.. किरकोळ अपवाद वगळता ही पद्धत आजही आपण जशीच्या तशी वापरतो. निवृत्तीनंतर 1829 आणि 1834 मध्ये दोन वेळेला त्याला गव्हर्नर जनरल हे सर्वोच्च पद देण्याचं तत्कालीन इंग्लंड सरकारने ठरवलं होतं. पण त्याने ते नाकारलं.. शेवटी...मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ग्रँट डफने एके ठिकाणी लिहून ठेवलंय.. एल्फिन्स्टनचे नाव अगदी सार्थपणे ब्रिटिश सरकारच्या कर्तृत्वाशी निगडीत झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर त्याने उपकार केले आहेत. त्याची आठवण नंतरच्या काळात कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी महाराष्ट्राच्या जनतेला राहील.. अगदी एल्फिन्स्टन स्थानकाचं नामकरण प्रभादेवी झालं असलं तरीही...
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Embed widget