एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : 'रामरायाची 'प्राणप्रतिष्ठा' अन् निवडणुकांचं 'अक्षता पूजन'

Ayodhya Ram Temple and Elections : शरयू किनारी, अयोध्येमध्ये (Ayodhya) जानेवारी 2024 मध्ये भव्यदिव्य मंदिरात (Ram Mandir) श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. राज्यभिषेकाप्रमाणेचं जणू हा सोहळ्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. पण यात मुख्य गोष्ट म्हणजे प्राणप्रतिष्ठेआधी 100 क्विंटल अक्षता पूजन होणार आहे आणि या अक्षता भगवान रामाचा (Lord Rama) प्रसाद म्हणून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरामध्ये जवळपास 62 कोटी लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि हाच जनसंपर्क लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) यज्ञामधली समिधा ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याचे आयाम असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीनं संपर्काचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, तेव्हा तेव्हा त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा वातावरणनिर्मितीला झाला आहे. संघानं आजवर अशी अनेक अभियानं राबवली आहेत. अशीच काही अभियानं आपण पाहुया. 1966 साली नेहरुंच्या काळात तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वात गौरक्षा स्वाक्षरी अभियान राबवलं गेलं होतं. सर्व समाजानं त्यात सहभागी होऊन कित्येक कोटी सह्या गोळा केल्या होत्या. त्यानंतर 2013 साली सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीचं निमित्त साधून संघाकडून स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी संबंधित इस्कॉन, विवेकानंद केंद्र, विविध संप्रदाय या सगळ्यांना देशपातळीवर एकत्र करुन एक समान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी संघाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर योगायोग म्हणजे त्यानंतर 2014 साली देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतरचा परिणाम समोर आहेच.

त्याचप्रमाणे गेल्या अनेक दशकांचा श्रीराम जन्मभूमीचा लढा जो अशक्यप्राय होता, तो निकरानं लढला गेला. याबाबतच मंदिराचं भूमिपूजन पार पडत असताना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं की, 1986-87 सालात संघाच्या बैठकीत चर्चा झाली आणि संघानं प्रत्यक्षपणे श्रीराम मंदिरासाठी लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी यासाठी 30 ते 35 वर्ष सलग काम केल्यानंतर तर यश मिळेल, असं भाकीत वर्तवलं होतं. पण अर्थात संघानं त्यावेळी यासाठी जे-जे कार्यक्रम राबवले ते म्हणजे मंदिराच्या विटा गावागावत नेणे, त्यांची मिरवणूक काढणे, यात गावपातळीवर आस्थेने, श्रद्धेने लोकांना यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्याभूमीसाठी चळवळ उभी केली गेली, संस्थांना जोडलं गेलं मुख्य म्हणजे सर्वांना त्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं. त्यानंतर कोर्टाचा लढा ते आता पार पडणारी प्राणप्रतिष्ठा हे सर्वांना माहिती आहेच.

आत्ताही श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर देगणीसाठी केलेलं आवाहन पाहा, यासाठी त्यांनी समाजातील प्रमुख व्यक्तींनाच नव्हे बांधलं जाणारं मंदिर प्रत्येकाचं आहे, त्यात सारे सहभागी होऊया अशी भाविनक साद घातली, ज्याला देशभरातून सर्व समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्यानंतर अक्षदा पूजनाचा कार्यक्रम... आता कार्यक्रम राबवताना तो गावांसह शहराशहरात राबवला जाणार आहे, त्यासाठी कार्यक्रम आखून झाला आहे, यासाठी थेट प्रक्षेपण करणं असेल, बॅनर्स लावणं असेल अशा लहान लहान योजना राबवून त्यात लोकसहभाग कसा राहिल याकडे संघाने आजवर निक्षून लक्ष दिलं आहे. 

संघाच्या याच संपर्क अभियानाच्या मॉडेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण संघ कधीही कोणाला मतदान करा अथवा करु नका सांगत नाही, की कोणत्याही पक्षाला मदत करत नाही किंवा कोणात्या पक्षाला मदत करु नका सांगत नाही, संघानं हाती घेतलेल्या कार्यक्रमांनी आजवर वातावरण निर्मिती केली आहे. आत्ताही या अक्षतांच्या कार्यक्रमामुळं संघ कैककोटी घरांमध्ये पोहोचेल, त्यांची विचारधारा अप्रत्यक्षपणे तिथे पोहोचेल, योगायोग म्हणजे संघाच्या या अभियानाचं एक वर्तुळ 2024 सालीच पूर्ण होत आहे आणि पुढच्याच वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुज्ञान अधिक न सांगणे!

डिस्क्लेमर : ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
ABP Premium

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget