एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : 'रामरायाची 'प्राणप्रतिष्ठा' अन् निवडणुकांचं 'अक्षता पूजन'

Ayodhya Ram Temple and Elections : शरयू किनारी, अयोध्येमध्ये (Ayodhya) जानेवारी 2024 मध्ये भव्यदिव्य मंदिरात (Ram Mandir) श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. राज्यभिषेकाप्रमाणेचं जणू हा सोहळ्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. पण यात मुख्य गोष्ट म्हणजे प्राणप्रतिष्ठेआधी 100 क्विंटल अक्षता पूजन होणार आहे आणि या अक्षता भगवान रामाचा (Lord Rama) प्रसाद म्हणून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरामध्ये जवळपास 62 कोटी लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि हाच जनसंपर्क लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) यज्ञामधली समिधा ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याचे आयाम असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीनं संपर्काचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, तेव्हा तेव्हा त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा वातावरणनिर्मितीला झाला आहे. संघानं आजवर अशी अनेक अभियानं राबवली आहेत. अशीच काही अभियानं आपण पाहुया. 1966 साली नेहरुंच्या काळात तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वात गौरक्षा स्वाक्षरी अभियान राबवलं गेलं होतं. सर्व समाजानं त्यात सहभागी होऊन कित्येक कोटी सह्या गोळा केल्या होत्या. त्यानंतर 2013 साली सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीचं निमित्त साधून संघाकडून स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी संबंधित इस्कॉन, विवेकानंद केंद्र, विविध संप्रदाय या सगळ्यांना देशपातळीवर एकत्र करुन एक समान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी संघाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर योगायोग म्हणजे त्यानंतर 2014 साली देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतरचा परिणाम समोर आहेच.

त्याचप्रमाणे गेल्या अनेक दशकांचा श्रीराम जन्मभूमीचा लढा जो अशक्यप्राय होता, तो निकरानं लढला गेला. याबाबतच मंदिराचं भूमिपूजन पार पडत असताना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं की, 1986-87 सालात संघाच्या बैठकीत चर्चा झाली आणि संघानं प्रत्यक्षपणे श्रीराम मंदिरासाठी लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी यासाठी 30 ते 35 वर्ष सलग काम केल्यानंतर तर यश मिळेल, असं भाकीत वर्तवलं होतं. पण अर्थात संघानं त्यावेळी यासाठी जे-जे कार्यक्रम राबवले ते म्हणजे मंदिराच्या विटा गावागावत नेणे, त्यांची मिरवणूक काढणे, यात गावपातळीवर आस्थेने, श्रद्धेने लोकांना यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्याभूमीसाठी चळवळ उभी केली गेली, संस्थांना जोडलं गेलं मुख्य म्हणजे सर्वांना त्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं. त्यानंतर कोर्टाचा लढा ते आता पार पडणारी प्राणप्रतिष्ठा हे सर्वांना माहिती आहेच.

आत्ताही श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर देगणीसाठी केलेलं आवाहन पाहा, यासाठी त्यांनी समाजातील प्रमुख व्यक्तींनाच नव्हे बांधलं जाणारं मंदिर प्रत्येकाचं आहे, त्यात सारे सहभागी होऊया अशी भाविनक साद घातली, ज्याला देशभरातून सर्व समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्यानंतर अक्षदा पूजनाचा कार्यक्रम... आता कार्यक्रम राबवताना तो गावांसह शहराशहरात राबवला जाणार आहे, त्यासाठी कार्यक्रम आखून झाला आहे, यासाठी थेट प्रक्षेपण करणं असेल, बॅनर्स लावणं असेल अशा लहान लहान योजना राबवून त्यात लोकसहभाग कसा राहिल याकडे संघाने आजवर निक्षून लक्ष दिलं आहे. 

संघाच्या याच संपर्क अभियानाच्या मॉडेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण संघ कधीही कोणाला मतदान करा अथवा करु नका सांगत नाही, की कोणत्याही पक्षाला मदत करत नाही किंवा कोणात्या पक्षाला मदत करु नका सांगत नाही, संघानं हाती घेतलेल्या कार्यक्रमांनी आजवर वातावरण निर्मिती केली आहे. आत्ताही या अक्षतांच्या कार्यक्रमामुळं संघ कैककोटी घरांमध्ये पोहोचेल, त्यांची विचारधारा अप्रत्यक्षपणे तिथे पोहोचेल, योगायोग म्हणजे संघाच्या या अभियानाचं एक वर्तुळ 2024 सालीच पूर्ण होत आहे आणि पुढच्याच वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुज्ञान अधिक न सांगणे!

डिस्क्लेमर : ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
Embed widget