एक्स्प्लोर

जीवनात ही घडी अशीच राहू दे!

यशवंत देवांनी एके ठिकाणी सुंदर विधान केले होते - "गाण्याची चाल कवितेतच दडलेली असते, आम्ही फक्त ती शोधून काढतो"!! सूत्रबद्ध विचार. इथे तर खुद्द संगीतकारच कवी असल्याने, शब्दातून काय मांडले आहे, याबाबत दुजाभाव संभवतच नाही!

आपल्याकडे एक समज काहीसा दृढ झालेला आहे. चित्रपटातील गाणी आणि खाजगी गाणी, यात फरक करताना, शब्दकळा, वाद्यमेळ आणि गायकीत फरक केला जातो. थोडक्यात, दर्जा म्हणून बघताना खाजगी गीतात, शब्दकळा समृद्ध तसेच मोजका(च) वाद्यमेळ आणि गरज नसताना गायकीतला फरक दाखवला जातो. जणू काही चित्रपट गीतांत याची कसलीच गरज नसते. यादृष्टीने पुढे जाऊन, अशी देखील वर्गवारी केली जाते - खाजगी गाणे म्हणजे शास्त्र आणि चित्रपट गाणे म्हणजे कलात्मकता असला (खरतर खुळचट) फरक केला जातो! वास्तविक, चित्रपटात अशी कितीतरी उदाहरणे दाखवता येतील, जिथे या समजाला छेद देता येतील. विशेषत: मराठी चित्रपटातील बरीच गाणी, दर्जा म्हणून फार "उजवी" आहेत. मोजका वाद्यमेळ, सशक्त कविता आणि तितकाच विलोभनीय गायकी आविष्कार. "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे असेच अप्रतिम गोड आहे. सहजसुंदर काव्यरचना, लोभस चाल आणि त्या चालीचे अत्यंत सुश्राव्य सादरीकरण. या गाण्याची एक गंमत आहे. या गाण्याचा कवी आणि संगीतकार एकच आहे - यशवंत देव. तसे बघितले रुढार्थाने यशवंत देव हे काही कवी नाहीत पण, शब्दांची जाण त्यांची निश्चित वाखाणण्यासारखी आहे. "स्वर आले जुळुनी"सारख्या अजरामर रचनेची शब्दकळा देवांचीच. कुठल्याही गाण्यात, गाण्याचे शब्द हे त्याचे बलस्थान असते तरीदेखील, कवितेत किती प्रतिमा घ्याव्यात किंवा कुठल्या छंदात शब्दरचना करावी याबाबत काही संकेत आहेत. मुळात सगळा सुरांचा आविष्कार असल्याने, रचनेत सुरांचे प्राबल्य अवश्यमेव. याचाच वेगळा अर्थ असा होतो, गाण्यातील शब्द हे अति गूढ, दुर्बोध असू नयेत. अर्थात, असा काही नियम मांडणे कठीण आहे. गाण्यातील शब्द अर्थवाही असणे तसेच ओळीच्या सुरवातीला आणि शेवटाला जे शब्द किंवा अक्षरे असतील, ते सुरांशी जवळीक साधणारे असतील तर, तेच गाणे गायला सहज सुंदर जाते. यशवंत देवांनी एके ठिकाणी सुंदर विधान केले होते - "गाण्याची चाल कवितेतच दडलेली असते, आम्ही फक्त ती शोधून काढतो"!! सूत्रबद्ध विचार. इथे तर खुद्द संगीतकारच कवी असल्याने, शब्दातून काय मांडले आहे, याबाबत दुजाभाव संभवतच नाही! सुरुवातीलाच सतारीची सुंदर गत आहे. त्या सुरावटीत, गाण्याची चाल दडलेली आहे. यमन रागावर चाल आहे, हे सहज उमजून घेता येते. संगीतकाराला चाल बांधताना, शब्दातील आशय नेमका ओळखून, ओळीतील कुठल्या शब्दाला अधूक महत्व द्यायचे, हे नेहमी ठरवावे लागते, ज्यायोगे कवितेतील आशय अधिक खोलवर ध्यानात येऊ शकतो. इथे बघूया, "जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे" चाल ऐकताना, लगेच जाणवेल, "जीवनात" हा शब्द स्वरांत मांडताना, "जी" शब्दावर हलकासा जोर दिलेला आहे आणि त्यातून नेमका अर्थ ध्वनित केलेला आहे. संगीतकाराचा कवितेविषयीचा अभ्यास हा अशा प्रकारे समजून घेता येतो. तसेच गाणे एका उत्फुल्ल मनोवृत्तीचे असल्याने, ह्याच ओळी परत घेताना, लय दुगणित घेऊन, चाल थोडी जलद घेतली असल्याने, गाण्याची स्वरावली नेमकी मनात ठसते. चाल थोडी जलद घेतल्याने, गाण्यातील भावविभोर वृत्ती खुलून आली. पहिला अंतरा देखील याच अंदाजाने बांधलेला आहे. ध्रुवपद जलद लयीत संपविल्यावर तीच लय कायम ठेऊन, वाद्यमेळ, रचना केली आहे. सतारीच्या जोडीने बासरी आणि व्हायोलीनचे सूर घेतले आहेत. या इथे व्हायोलीनवर जे सूर घेतले आहेत, त्याची "घडण" थोडी यमन कल्याण रागाची आठवण करुन देणारी आहे. हे व्हायोलीनचे सूर जरा ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे कारण पुढील विवेचनात याच सुरांचे थोडे वेगळे संदर्भ आपल्याला बघता येतील. इथे जे व्हायोलिनचे सूर आहेत, ते जरा बारकाईने ऐकले तर, अशीच सुरावट "या चिमण्यांनो परत फिरा" आणि "जीवन डोर तुम्ही संग बांधी" या गाण्यातील दुसऱ्या अंतऱ्यात घेतलेली आहे. भारतीय संगीताची ही खास गंमत आहे. वास्तविक, हे गाणे यमन रागावर आधारित आहे पण तरीही यमन कल्याण रागाचा संदर्भ इथे चपखल लागू पडतो. आता, ही तिन्ही गाणी संपूर्ण वेगळ्या धाटणीची आहेत. एकाचा दुसऱ्याशी काहीही संदर्भ नाही पण, स्वरांची भाषाच अशी आहे, तिथे अशी जवळीक साधली जाते. या दोन रागांत प्रमुख फरक एकाच सुराचा आहे, एकात "शुद्ध मध्यम" आहे तर दुसऱ्यात "तीव्र मध्यम" आहे. व्यासंग असा दिसतो की या स्वरांची जोड कशी संपूर्ण गाण्यात कशी सामावून घेतली जाते. अंतऱ्यातील जलद लय, पहिले कडवे सुरु होताना, परत मुखड्याच्या सुराशी येऊन थांबते आणि कडवे सुरु होते. "रंगविले मी मनात चित्र देखणे, आवडले वेडीला ते स्वप्न खेळणे; स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे" या ओळीतील "चांदवा" वास्तविक, उर्दूतील "चांद" शब्दाचे वेगळे स्वरुप आहे पण, रचनेचा "मीटर" लक्षात घेता, तिथे ३ अक्षरांचाच शब्द आवश्यक होता आणि तिथे मराठीतील "चंद्र" शब्द बसवला असता तर गाण्याची लय थोडी बिघडली असती. मघाशी मी, गाण्यातील शब्दांविषयी जे लिहिले, ते याच संदर्भात तपासून घेणे योग्य आहे. लताबाईंची गायकी किती "श्रीमंत" आहे, ते बघण्यासारखे आहे. पहिल्या ओळीतील "देखणे" हा शब्द किंवा पुढील ओळीतील अंत्याक्षर "दे" या शब्दावरील हलकी पण वजनदार फिरत ऐकण्यासारखी आहे. ही फिरत, सहज वाढवता येऊ शकेल पण, त्याने शब्दांच्या अर्थाचा "बेरंग" झाला असता आणि याच उद्देशाने, ती हरकत, इतकी थोडक्यात आटोपली आहे की, ऐकताना, जीव कासावीस व्हावा!! सुगम संगीतातील "अलंकार" हे असेच असतात. "हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा;स्पर्शातून अंग अंग धुंद होऊ दे, जीवनात ही घडी …." या ओळीची सुरुवात "हळूच" या शब्दाने होते. नायकाकडे बघायचे आहे पण त्याला न जाणवून देता, असा मुग्ध शृंगार इथे अभिप्रेत आहे म्हणून याच अर्थाने, "हळूच" शब्द लताबाईंनी उच्चारला आहे. अशा खास अलंकारांनीच गाणे खुलत जाते आणि रसिकांच्या मनात उतरत जाते. "लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा" या ओळीचा पूर्वार्ध, आधीच्या ओळीत असल्याने, शब्दांचा आशय आणि त्याला दिलेली सुरांची जोड, इतकी सुंदर आणि गोड आहे, की परत, परत या स्वर वाक्यांशाचा आस्वाद घ्यावा! "पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता; मिलनात प्रेमगीत धुंद होऊ दे, जीवनात ही घडी……" हे अखेरचे कडवे म्हणजे एका धुंद क्षणाचा अविस्मरणीय समारोप आहे. वास्तविक, चाल तशीच आहे, त्यात काही वेगळ्या सुरांचा उपयोग नाही पण जर का मुळात चालच अति श्रवणीय असेल तर त्यात काही प्रयोग करण्याची फारशी गरज पडत नाही. त्याचा परिणाम असा होतो, गाण्याचा सुरुवातीचा परिणाम, आपल्या मनात अधिक ठाम होत जातो. आज इतकी वर्षे मी हे गाणे ऐकत आहे आणि प्रत्येक वेळेस हे गाणे अगदी नव्याने ऐकल्याप्रमाणे मनात झिरपत जाते!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Iran War Live Update: युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
Share Market : शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी,  सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Iran War Live Update: युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
Share Market : शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी,  सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
Rohit Sharma: टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
Shivsena UBT : ओमराजे निंबाळकरांचा सांगलीहून जाऊन त्यांचा प्रचार केला, अहोरात्र झटलो त्याचा हिशोब चुकता करणार, ठाकरेंच्या तालुकाप्रमुखांचा इशारा
गद्दारांनो ठाकरे कधी संपत नसतात..., ठाकरेंच्या मेळाव्यासाठी आलेले शिवसैनिक प्रचंड संतापले
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
Thane Politics : टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
Embed widget