Vidur Niti : व्यक्तीने 'या' गोष्टींची सतत काळजी घेतली पाहिजे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
Vidur Niti : विदुर नीतीनुसार, व्यक्तीने जीवनात या गोष्टींपासून सदैव सावध राहिले पाहिजे. चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.
![Vidur Niti : व्यक्तीने 'या' गोष्टींची सतत काळजी घेतली पाहिजे, चुकूनही करू नका दुर्लक्ष vidur niti marathi news know from what things person should always keep themselves aware Vidur Niti : व्यक्तीने 'या' गोष्टींची सतत काळजी घेतली पाहिजे, चुकूनही करू नका दुर्लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/15/63c52bc681a3f53e6a6d1244660144f01663228997203381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vidur Niti : जेव्हा एखाद्या व्यक्तीला खरा आणि योग्य मार्गदर्शक मिळतो, तेव्हा तो जीवनातील प्रत्येक यश मिळवतो. सध्या महात्मा विदुर यांची धोरणे लोकांना अनेक प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. विदुर नीती माणसाला फक्त योग्य मार्गावर चालायला शिकवत नाही, तर ती योग्य आणि अयोग्य यातील फरक देखील सांगते.
जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी
विदुर नीति हे महाभारत काळातील महात्मा विदुर आणि हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र यांच्यातील संभाषण आणि संवादांचे संकलन आहे. यामध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी आणि गुण सांगण्यात आले आहेत. विदुर नीतीनुसार, व्यक्तीने जीवनात या गोष्टींपासून सदैव सावध राहिले पाहिजे. चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.
विदुर धोरणानुसार 'या' गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका
श्लोक
यत् सुखं सेवमानोपि धर्मार्थाभ्यां न हीयते । कामं तदुपसेवेत न मूढव्रतमाचरेत् ।।
अर्थ : विदुर नीतीच्या या श्लोकात महात्मा विदुरांनी सांगितले आहे की, प्रत्येक मानवाला धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचे आणि त्याच्या सुख-सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्याने जास्त प्रमाणात फायदा घेऊ नये. यामुळे तो अधर्माचा मार्ग स्वीकारतो. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने आपले सुख उपभोगताना धर्म आणि न्यायाच्या बाबतीत सदैव जागृत असले पाहिजे. चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नये. विदुरजी म्हणतात की, काम आणि पैशाच्या लोभापोटी व्यक्ती अधर्माचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे.
श्लोक
वृत्तं यत्नेन संरक्षेद् वित्तमेति च याति च । अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ।।
अर्थ : विदुरजी या श्लोकाद्वारे म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या चारित्र्याचे सर्वात जास्त रक्षण केले पाहिजे, कारण जीवनात पैसा येतच राहतो. संपत्तीची हानी होऊनही चारित्र्य स्वच्छ असेल तर काहीही वाईट होत नाही. चारित्र्य नष्ट झाले तर कमावलेले धन नष्ट होते. म्हणूनच माणसाने नेहमी तेच काम केले पाहिजे, जेणेकरून त्याच्या चारित्र्यावर कोणताही डाग पडणार नाही. त्याने आपल्या चारित्र्याबद्दल नेहमीच जागरूक असले पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)