Rain Water Remedies : पावसाच्या पाण्यामुळे होईल कर्जमुक्ती, फक्त 'हे' उपाय करा
Rain Water Remedies : पावसाचे पाणी आपल्या आयुष्यात येणारे अडथळेही दूर करते. वास्तूमध्येही पावसाच्या पाण्याशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Rain Water Remedies : पावसाची रिमझिम सर्वांनाच आवडते. या पावसामुळे मनाला शांती मिळते, पण तुम्हाला माहीत आहे का की पावसाचे पाणी आपल्या आयुष्यात येणारे अडथळेही दूर करते. वास्तूमध्येही पावसाच्या पाण्याशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय अवलंबले तर अनेक समस्यांमधून बाहेर पडू शकाल.
उपाय क्रमांक एक
जर तुम्हाला दीर्घकाळच्या आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर भगवान शंकराला पावसाच्या पाण्याने अभिषेक करा. असे केल्याने रोगापासून आराम मिळेल.
उपाय क्रमांक दोन
पैशाची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचे पाणी भांड्यात ठेवा. हे पाणी काही वेळ उन्हात ठेवा. यानंतर हे पाणी आंब्याच्या पानांवर शिंपडा. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल.
उपाय क्रमांक तीन
जर तुमच्यावर कर्ज झाले असेल आणि तुम्ही कर्ज फेडण्यास असमर्थ असाल तर एका भांड्यात पावसाचे पाणी भरून त्यात दूध टाकून देवाचे नामस्मरण करून या पाण्याने स्नान करावे. असे केल्याने कर्ज हळूहळू कमी होऊ लागते.
उपाय क्रमांक चार
लग्नात खूप अडथळे येत असतील तर पावसाच्या पाण्याने गणपतीचा जलाभिषेक करावा. कोणतेही अडथळे येणार नाहीत.
उपाय क्रमांक पाच
आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मातीचे भांडे पावसाच्या पाण्याने भरा आणि नंतर हे भांडे घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. उत्तर-पूर्व कोपऱ्यात ठेवता येत नसेल तर उत्तर दिशेला ठेवा.
उपाय क्रमांक सहा
व्यवसायात नुकसान होत असेल तर पावसाचे पाणी पितळेच्या भांड्यात भरावे. एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला या पाण्याने अभिषेक करा, असे केल्याने कोणतीही हानी होणार नाही.
उपाय क्रमांक सात
जर घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर पावसाचे पाणी भांड्यात भरून ठेवा. नंतर हनुमानजींसमोर ठेवा आणि संपूर्ण सावनभर दररोज ५१ हनुमान चालिसाचे पाठ करा. त्यानंतर हे पाणी घराच्या सर्व भागात शिंपडा. असे केल्याने नकारात्मक शक्तींचा अंत होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...
Before You Go
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report



















