एक्स्प्लोर

Premanand Maharaj: पूजा-प्रार्थना न करताही काही लोक आयुष्यात इतके यशस्वी का असतात? प्रेमानंद महाराजांचं उत्तर ऐकून भाविकही थक्क...

Premanand Maharaj: एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारले "काही लोक कोणतेही धार्मिक विधी न करताही इतके यशस्वी का होतात?" महाराजांचे उत्तर सध्या खूप व्हायरल होतंय...

Premanand Maharaj: अनेकदा आपण पाहतो, काही लोक कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा वारंवार देवाची पूजा किंवा प्रार्थना करतात. याचं कारण म्हणजे ते अत्यंत धार्मिक असतात. मात्र काही लोक असे असतात, जे कधीच देवाची पूजा-प्रार्थना करत नाही, तरीही ते त्यांच्या आयु्ष्यात इतके यशस्वी का होतात? त्यांच्याकडे भरपूर धन-दौलतही असते, यामुळे अनेकांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, की असे का होते? कधीकधी, तुम्ही पूजा विधी करता आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवता, परंतु तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा वेळी, तुम्ही स्वतःला आणि देवाला जाब विचारू लागता. मात्र, तुमच्या आजूबाजूला असे लोक असू शकतात जे कोणतेही धार्मिक कार्य न करता मोठे यश मिळवतात आणि श्रीमंत होतात. एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना असाच प्रश्न विचारला. त्यांनी महाराजांना विचारले, "काही लोक कोणतेही धार्मिक विधी न करताही इतके यशस्वी का होतात?" प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचे उत्तर असे दिले...

भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांचं आश्चर्यकारक उत्तर...(Premanand Maharaj)

एका व्यक्तीने महाराजांना विचारले की बरेच लोक कोणतेही विधी न करताही यशस्वी होताना दिसतात. या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद जी महाराजांनी स्पष्ट केले की याचे कारण प्रारब्ध आहे, जे भूतकाळातील आपल्या कर्मांचे परिणाम आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भूतकाळातील कर्मांचे फळ मिळते. काही लोक आज चुकीच्या गोष्टी करत असतील, परंतु त्यांच्या भूतकाळातील चांगल्या कर्मांचे फळ अजूनही चालू आहे. म्हणूनच ते आरामात जगतात. जेव्हा त्यांच्या भूतकाळातील वाईट कर्मांची किंमत चुकवण्याची वेळ येईल तेव्हा त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.

अशा वेळी निराश होऊ नये...

प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की, काही चांगले आणि धार्मिक लोक, अगदी देवाचे नाव घेणारे लोक देखील आहेत, जे अडचणींना तोंड देतात. ते आज पुण्यकर्मे करत असतील, परंतु त्यांच्या भूतकाळातील वाईट कर्मांचा प्रारब्ध त्यांना अडथळा आणत आहे. अशा वेळी निराश होऊ नये, कारण एक दिवस प्रारब्ध संपेल आणि आपल्याला आपल्या चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच मिळेल.

तर दुसरा मार्ग स्वीकारला पाहिजे...

प्रेमानंद सांगतात की, जर आपल्याला आयुष्यात वारंवार अपयश आले, नोकरी मिळाली नाही किंवा गोष्टी चुकीच्या झाल्या तर हार माने चुकीचे आहे. जर एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग स्वीकारला पाहिजे. जर तुमचे एखादे कार्य यशस्वी झाले नाही, तर छोटा व्यवसाय सुरू करा, मजूर म्हणून काम करा किंवा रिक्षा चालवा. ही सर्व आदरणीय कामे आहेत. मेहनती व्यक्ती, जरी लहान नोकऱ्यांपासून सुरुवात केली तरी, हळूहळू प्रगती करते. यश केवळ मोठ्या कामातून मिळत नाही, तर प्रामाणिकपणा आणि प्रयत्नातून मिळते.

देव कठोर नाही...

प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की, देव कठोर नाही. तो आपले समर्पण पाहतो आणि अनेक वेळा आपली परीक्षा घेतो: अन्नाच्या बाबतीत, कुटुंबात, कठीण परिस्थितीत. जर आपण या संकटांमध्ये धीराने पुढे गेलो तर देव नक्कीच त्याचे आशीर्वाद देईल. जसे सुदामा अनेक दिवस उपाशी राहिला, पण शेवटी देवाने त्याला इतके काही दिले की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. कोणत्याही भक्तासोबतही असेच घडू शकते.

कितीही अडचणी आल्या, तरी देवावरील विश्वास गमावू नये..

एका व्हायरल व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराज म्हणतात की, एखाद्याच्या अडचणी पाहून देवावरील विश्वास गमावू नये. देव प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत असतो. आज गरिबी आहे, उद्या संपत्ती असू शकते. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे रामाचे नाव, जे कधीही संपत नाही. म्हणून, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि चांगले आचरण सोडू नये. अपयश आले तरी मार्ग बदला, पण थांबू नका. देवावर विश्वास ठेवा, नामस्मरण करत राहा, आनंदी राहा. योग्य वेळ आल्यावर तुमचे जीवन नक्कीच बदलेल.

हेही वाचा

Weekly Horoscope: नोव्हेंबरचा चौथा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, करिअर, प्रेम जीवन? कोणत्या राशी मालामाल होणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget