एक्स्प्लोर

Premanand Maharaj: खरंच जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का? प्रेमानंद महाराजांकडून सत्य जाणून घ्या..

Premanand Maharaj: अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जादूटोण्यामुळे एखाद्याचे वाईट होते किंवा स्वतःला आनंद मिळतो. पण खरंच जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का? प्रेमानंद महाराज म्हणतात...

Premanand Maharaj: ते म्हणतात ना, या देव आहेत तसे दानवही आहेत. तसाच चांगुलपणा आहे, तर वाईटपणाही आहे, आणि पूजा असेल तर जादूटोणा किंवा काळी जादूही अस्तित्वात आहे, अशी मान्यता आहे. एकदा प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने एक प्रश्न विचारला, तो म्हणाला, या जगात खरंच जादूटोणा आहे का? आणि यामुळे एखाद्याचे नशीब खरंच बदलू शकते? तेव्हा या शक्तीबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले ते जाणून घ्या...

जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का? प्रेमानंद म्हणतात..

भक्ताच्या या प्रश्नावर प्रेमानंद महाराज म्हणतात, आयुष्यात जेव्हा काहीच योग्य आणि सकारात्मक घडत नाही, तेव्हा अनेकांना वाटते की, कोणीतरी आपल्यावर जादूटोणा केला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. आपल्याला असे वाटते की कोणीतरी काहीतरी करणी किंवा काळी जादू केली आहे. परंतु हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा आपले मन आपल्याला काहीतरी वेगळेच सांगत असते,. मग आपण इतरांना दोष देऊ लागतो, पण प्रत्यक्षात पाहता हे आपल्याच कर्माचे भोग आहेत. असे महाराज म्हणतात.

'वाईट कर्माचे ओझे कोणत्या ना कोणत्या रूपाने भोगावेच लागते' 

प्रेमानंद महाराज म्हणतात... आपल्या वाईट कर्माचे ओझे आपल्यावर पडले, तर आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या रूपाने भोगावेच लागते. काही घटना अशा घडतात, तेव्हा आजार होतात किंवा आपले मन विचलित होते. हे सर्व आपल्याच कृतीचे परिणाम आहे. आपण स्मशानभूमीत असो किंवा इतर कुठेही असो, आपली चांगली कृत्ये आपल्याला प्रत्येक परिस्थितीत वाचवतात. पण कर्म वाईट असेल तर प्रत्येक पायरीवर अडचणी येतात.

जादूटोण्याची भीती कशी टाळायची?

प्रेमानंद महाराज म्हणतात... भजन आणि देवाचे नामस्मरण केल्याने आपल्याला या समस्यांपासून स्वत:ला वाचवता येतं. जेव्हा आपण देवाचे ध्यान करतो, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती किंवा जादूटोणा आपल्याजवळ येऊ शकत नाही. हनुमान चालिसामध्येही लिहिलंय की, "महावीराचे नाव ऐकल्यावर भूत आणि पिशाच्च जवळ येत नाहीत." म्हणजेच जेव्हा आपण भगवंताचे नाव घेतो, तेव्हा कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर राहते.

भगवंताचे नाव घ्या...

वैयक्तिक अनुभव असेही सांगतो की, आपल्या घरात भगवंताचे नाव घेतले, तर कोणतीही वाईट शक्ती तिथे प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे दररोज देवाची पूजा करा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. जेव्हा आपण भक्तीमध्ये लीन होतो, तेव्हा केवळ भूत आणि जादूटोणा दूर राहत नाही. तर आपले मन देखील शांत आणि प्रसन्न होते.

जेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट येते...

प्रेमानंद महाराज म्हणतात, आपण हे समजून घेतले पाहिजे की, जेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट येते तेव्हा त्याचे मूळ कारण आपले कर्मच असते. जर आपण आपली कर्म सुधारले. देवाच्या चरणी लीन झालो. भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले तर कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही. म्हणून, न घाबरता भगवंताचे स्मरण करा आणि सर्व प्रकारच्या चिंता आणि त्रास विसरून जा. भजन आणि भगवंताच्या नामाचा जप ही एकमेव शक्ती आहे, जी आपल्याला कोणत्याही वाईट परिस्थितीतून वाचवू शकते.

हेही वाचा>>>

Garud Puran: मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत असतो? आत्मा यावेळी काय विचार करतो? गरुड पुराणात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
Parth Pawar Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report
Nashik Tapovan Tree Cutting : कुंभमेळा आणि तपोवन, महायुतीत राजकारण Special Report
Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
Parth Pawar Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Land Scam Pune Who Is Sheetal Tejwani: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पोलिसांकडून अटक, जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
Rohit Pawar: रोहित पवार हाजीर हो... माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
रोहित पवार हाजीर हो... माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
Dombivli Reel Star Shailesh Ramugade Case: आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अन्...; डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं
आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अन्...; डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं
Embed widget