एक्स्प्लोर

Geeta Dnyan : 'या' लोकांना वृद्धापकाळात भोगावी लागतात पापं, जाणून घ्या गीतेची अमूल्य शिकवण

Shree Krishna Motivational Quotes : हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. शिवाय जीवनाचं सार सांगितलं आहे.

Shree Krishna Geeta Dnyan : असे मानले जाते की, श्रीमद्भागवतगीता (Bhagvad geeta) हा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो. गीतेमधून मानवाला जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत. गीतेतील ही शिकवण श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती. ही शिकवण माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. श्रीमद्भागवत गीतेचे वचन अंगीकारल्याने जीवन सुधारते. या गोष्टींचे पालन केल्याने व्यक्तीचा राग आणि मत्सराची भावना संपते. जाणून घ्या श्रीकृष्णाने कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत.

...तर वृद्धापकाळात दुःख भोगावे लागते

हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. शिवाय जीवनाचं सार सांगितलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात की, वस्त्र बदलण्याऐवजी माणसाने हृदय बदलण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गीतेनुसार ज्याने तारुण्यात जास्त पाप केले असेल त्याला वृद्धापकाळात दुःख भोगावे लागते. श्रीमद्भागवत गीतेनुसार आनंद हा नेहमी माणसाच्या आत असतो, पण मनुष्याला तो बाह्य सुखांमध्ये सापडतो. देवाची आराधना केवळ शरीराने न करता संपूर्ण मनाने केली पाहिजे. देवाची उपासना त्यांना प्रेमाच्या बंधनात बांधते. मनुष्य पुनर्जन्म घेतो केवळ त्याच्या वासनेमुळे. माणसाने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला तर त्याच्या आयुष्यात कधीही विकार आणि संकटे येत नाहीत. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय माणसात कधीच येत नाहीत.

 

माणसाला देवाशिवाय कोणी नाही
श्रीकृष्ण म्हणतात की, मनुष्याने भगवंतात विलीन व्हावे. माणसाला देवाशिवाय कोणी नाही. यासोबतच ते कोणाचेही नाही, हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे. उपभोगातून मिळणारा आनंद हा तात्पुरता असतो तर त्यागातून मिळणारा आनंद हा शाश्वत असतो. श्रीकृष्ण म्हणतात की, भगवंताच्या कृपेने सत्संग तर मिळतोच पण मनुष्याला त्याच्या कर्मांमुळे वाईट संगतही लाभते.

गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते

भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. गीतेत श्रीकृष्णाने दु:खाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे. आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहेत. गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

krishna motivational quotes : श्रीकृष्णाने दु:खाला सर्वश्रेष्ठ मित्र का म्हटले आहे? काय आहे गीतेची शिकवण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget