एक्स्प्लोर

Astrology On Relationships : राहू, केतू की शनी? कुंडलीतील कोणत्या ग्रहामुळे प्रेमात मिळतो धोका? ज्योतिषशास्त्र सांगतात...

Astrology On Relationships : कुंडलीतील काही ग्रह आणि नक्षत्र प्रेमसंबंध दर्शवतात. जेव्हा या भावांवर शुभ ग्रहांचा प्रभाव पडतो, तेव्हा व्यक्तीचे प्रेमसंबंध दृढ होतात.

Astrology On Relationships : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology), ग्रह आणि नक्षत्रदेखील नातेसंबंध (Relationship) आणि प्रेमाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमच्या कुंडलीतील ग्रह शुभ असतील तर प्रेमात यश मिळतं. तसेच, वैवाहिक जीवन देखील आनंदी राहतं. पण, कुंडलीत ग्रहांची स्थिती जर खराब असेल तर प्रेमात व्यक्तीची वारंवार फसवणूक होते. यामुळेच कुंडलीतील कोणत्या ग्रहाच्या वाईट प्रभावामुळे प्रेमात फसवणूक होते ते जाणून घेऊयात. 

'या' ग्रहांमुळे प्रेमात फसवणूक होते

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत पंचमेश आणि सप्तमेश हे ग्रह नातेसंबंध दर्शवतात. जेव्हा या भावांवर शुभ ग्रहांचा प्रभाव पडतो तेव्हा व्यक्तीचे प्रेमसंबंध दृढ होतात आणि त्यांना खरं प्रेम मिळतं. या शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळते. तसेच, जोडीदाराच्या भाग्यातही वाढ होते. जेव्हा कुंडलीच्या या भावावर अशुभ ग्रह ग्रहाचा प्रभाव असतो. तेव्हा प्रेम संबंधांमध्ये काहीना काही अडथळे निर्माण होतात. यामुळेच नात्याला यश मिळत नाही.  

जर पंचमेश आणि सप्तमेश ग्रह तुमच्या कुंडलीत कमजोर असतील तर व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये अपयशाचा सामना करावा लागतो. अशा वेळी नात्यात वारंवार फसवणूक होते. दोघांत वाद सुरु होतात. आणि याचं अंतिम फलित म्हणजे नात्यात अंतर वाढतं आणि नातं तुटतं. म्हणजेच ब्रेकअप होतो.  

राहू, मंगळ, सूर्य की शनी?

ज्योतिष शास्त्रानुसार राहू, मंगळ, सूर्य आणि शनी यांपैकी कोणतेही ग्रह उच्च राशीत असतील तर त्यांची दृष्टी उच्च राशीतून पाचव्या भावात आणि सातव्या भावावर पडते. प्रेमसंबंधांसाठी किंवा वैवाहिक जीवनासाठी ही स्थिती चांगली नसते. कुंडलीत राहू, केतू आणि चंद्राचा संयोग असला तरी प्रेमसंबंधांमध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात. चंद्रामुळे मनातील विचार बदलू लागतात आणि प्रत्येक विषयावर वाद होऊ लागतात. अशा परिस्थितीत ब्रेकअप लवकर होते. असं ज्योतिष शास्त्रात म्हटलंय. 

राहूची महादशा नातेसंबंधांसाठी घातक 

राहूची महादशा नातेसंबंधांसाठी धोकादायक मानली जाते. यामुळे, व्यक्तीमध्ये संयमाचा अभाव असतो आणि नात्यात अडकून राहण्याची भीती असते. राहू ग्रहाच्या महादशा दरम्यान, व्यक्तीला नातेसंबंध तयार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात खूप अडचणी येतात. अशा वेळी त्यांचे प्रेमसंबंध स्थिर राहत नाहीत.

राहूच्या महादशामध्ये घटस्फोटाची शक्यताही वाढते. राहू वैवाहिक जीवनात अनियमितता, अस्थिरता आणि विश्वासघात निर्माण करतो. महादशा दरम्यान वैवाहिक संबंधांमध्ये तणाव वाढतो आणि व्यक्तीला परस्पर संवादात अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत या ग्रहांना शांत करण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे असं ज्योतिषशास्त्रात म्हटलंय. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Today's Luckiest Zodiac Signs : आज ब्रह्मयोगासह बनले अनेक शुभ योग! भगवान विष्णूची 'या' 5 राशींवर असणार कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: पैसा, नोकरीत नशीब देतं साथ! 'या' जन्मतारखा म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले! गुरू ग्रह करतो भरभराट, अंकशास्त्र 
पैसा, नोकरीत नशीब देतं साथ! 'या' जन्मतारखा म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले! गुरू ग्रह करतो भरभराट, अंकशास्त्र 
Guru Transit 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, 11 मार्चची गुरूची थेट चाल, पुढचे 3 महिने 4 राशींची भरभराट, कोणासाठी टेन्शन? 
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, 11 मार्चची गुरूची थेट चाल, पुढचे 3 महिने 4 राशींची भरभराट, कोणासाठी टेन्शन? 
Guru Transit 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 11 मार्चला गुरू ग्रह मार्गी, 3 राशींना जूनपर्यंत नो टेन्शन, पैसा दुप्पट, नोकरीत प्रमोशन...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 11 मार्चला गुरू ग्रह मार्गी, 3 राशींना जूनपर्यंत नो टेन्शन, पैसा दुप्पट, नोकरीत प्रमोशन...
Guru Margi 2026: गुढीपाडवा पूर्वीच 4 राशींचं नशीब फळफळलं! आज गुरू ग्रह मार्गी झाला, दत्तगुरूंच्या कृपेने कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम....
गुढीपाडवा पूर्वीच 4 राशींचं नशीब फळफळलं! आज गुरू ग्रह मार्गी झाला, दत्तगुरूंच्या कृपेने कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम....

व्हिडीओ

Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
Embed widget