एक्स्प्लोर

Tomato Farmer : टोमॅटो विकून शेतकरी बनला करोडपती, शेतीमुळे 15 दिवसांत बदललं नशीब

Telangana Farmer selling tomatoes : तेलंगणातील शेतकरी महिपाल रेड्डी आधी त्यांच्या 20 एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे.

Telangana Farmer Earns 2 Crore : प्रत्येक स्वयंपाक घरात हमखास आढळणारा आणि अन्नाची चव वाढवणाऱ्या टोमॅटोचे (Tomato) भाव सध्या गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना तर टोमॅटो परवडत नसल्याचं चित्र आहे. मात्र, याच टोमॅटोनं एका शेतकऱ्याचं नशीब बदललं आहे. टोमॅटो विकून एक शेतकरी चक्क करोडपती बनला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याची किंमत विविध ठिकाणी 100 ते 120 रुपये प्रतिकिलो आहे. याचाच फायदा या शेतकऱ्याला झाला आहे.

टोमॅटो विकून शेतकरी बनला करोडपती

तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एका शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक विकून गेल्या 15 दिवसांत सुमारे दोन कोटी रुपये कमावले आहेत. मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महिपाल रेड्डी आधी त्यांच्या 20 एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. पण, त्यानंतर त्यांनी टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जणू त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे.

20 एकर शेतीमुळे 15 दिवसांत बदललं नशीब

पीटीआयला माहिती देताना शेतकरी महिपाल रेड्डी यांनी सांगितलं की, त्यांच्या शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे. रेड्डी यांनी स्वतःची 20 एकर जमीन सोडून त्यांनी 80 एकर भाडेतत्त्वावर घेतली असून 60 एकरमध्ये भातशेती केली आहे आणि उर्वरित जमिनीवर ते इतर पिके घेतात.

भातशेतीत झालेल्या नुकसानीनंतर घेतला निर्णय

महिपाल रेड्डी यांमी माहिती देताना सांगितलं की, ते त्यांच्या 20 एकर शेतजमिनीवर आधी भातशेती करायचे. पण या भातशेतीत अनेकवेळा त्यांना नुकसान सहन करावं लागलं. यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांनी आठ एकरांवर भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या मनात टोमॅटोची शेती करण्याचा विचार आला. तेलंगणाच्या बाजारात सहसा शेजारच्या आंध्र प्रदेशातील मदनपल्ले आणि कर्नाटकातील कोलार येथून टोमॅटो येतात. त्यामुळे रेड्डी यांनी त्या ठिकाणांना भेटी देऊन त्यांच्या शेतीच्या शैली आणि तंत्रांचा अभ्यास केला आणि त्यानंतर टोमॅटोची शेती केली.

टोमॅटो विकून कोट्यवधीचं उत्पन्न

तेलंगणामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात जास्त तापमान असते. हे तापमान टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य नसते, त्यामुळे तापमान आणि हवामानाचा परिणाम नियंत्रित करण्यासाठी त्यांनी 16 लाख रुपये खर्चून आठ एकर टोमॅटो लागवड क्षेत्रात जाळी बसवली. शेड बांधले. यामुळे टोमॅटोचे उच्च उत्पादन आणि दर्जेदार उत्पादन आलं. 25 ते 28 किलो टोमॅटोच्या पेटीला 2500 ते 2700 रुपये भाव मिळाला. त्यांनी सुमारे 7,000 क्रेट सुमारे 2 कोटी रुपयांना विकले आहेत. 

 

रेड्डी एप्रिलमध्ये टोमॅटोची पेरणी करतात आणि जूनच्या अखेरीस पीक काढणीसाठी तयार होते. ते शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि स्टेकिंग पद्धती वापरतात. जर सर्व काही ठीक झाले तर ते आठवडाभरात त्यांचे सर्व टोमॅटो विकतील, असं रेड्डी यांनी सांगितलं आहे. रेड्डी यांचे टोमॅटो हैद्राबादच्या बोयनपल्ली, शाहपूर आणि पाटनचेरू मार्केट आणि त्याच्या बाहेरील भागात विकले आहेत.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 640 कोटी रुपये जमा, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ? 
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 640 कोटी रुपये जमा, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ? 
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  

व्हिडीओ

Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Embed widget