एक्स्प्लोर

Parbhani : प्रयोगशील शेती करणारे शेतकरी गुरुजी, परभणीच्या शिक्षकाचे शेतीत अनोखे प्रयोग  

Parbhani News Update : परभणीच्या मांडाखळी येथील प्राथमिक शिक्षक आणि शेतकरी मुंजाभाऊ शिलवणे यांनी आपली शेती उत्तमरित्या पिकवली आहे. चार एकर शेतीत मोसंबी लागवड करून त्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनचे पिक घेतले आहे. 

Parbhani News Update : परभणीतील एका शिक्षकाने आपल्या शेतीत अनोखे प्रयोग करून प्रयोगशील शेती केली आहे. मुंजाभाऊ शिलवणे असे या शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबरच शेती देखील प्रगतशील बनवली आहे. याबरोबरच ते गावातील इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी काम करत आहेत.  

परभणीच्या मांडाखळी येथील प्राथमिक शिक्षक आणि शेतकरी मुंजाभाऊ शिलवणे यांनी आपली शेती उत्तमरित्या पिकवली आहे. मुंजाभाऊ सध्या गावापासून पाच किलोमीटर असलेल्या पाळोदी जिल्हा परिषद शाळेवर पाथमिक शिक्षक आहेत. त्यांना वडिलोपार्जित अडीच एकर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी मेहनत करून अजून दीड एकर शेती घेतली आहे. आज चार एकर शेतीत मोसंबी लागवड करून त्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनचे पिक घेतले आहे. 

भाजीपाला, दुधव्यवसाय,गांडूळखत, शेणखत निर्मिती करण्यासह पाण्याची बचत व्हावी म्हणून त्यांनी सर्व शेती ड्रीपवर केले आहे. सकाळी नऊ वाजता शाळा असते, त्यामुळे पहाटेच उठून ते शेतीकडे जातात. आठ वाजेपर्यंत शेतीतील सर्व कामे आटोपून दिवसभराचे नियोजन लावून ते पाळोदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाठतात. तेथे देखील केवळ ज्ञानार्जन करत नाहीत तर विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवतात.  
 
मुंजाभाऊ यांचे वडील-आई,बायको आणि स्वतः मुंजाभाऊ हे सर्व जण शेतीत राबतात. वडील दुधाचा व्यवसाय सांभाळतात. आई आणि पत्नी त्यांना इतर शेतीकामात मदत करतात. मात्र सर्व नियोजन  मुंजाभाऊ यांचेच असते. यातूनच ते वर्षाकाठी चार ते पाच लाख रूपयांचा नफा कमावतात.  

स्वतःची शेती, शाळा आणि विद्यार्थी यापलीकडे जाऊन मुंजाभाऊ गावकऱ्यांची शेतीही प्रागितिशील व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत स्वराज्य ऍग्रो शेतकरी बचत गट अवजार बँक तयार केलीय. ज्यात ते इतर शेतकऱ्यांना लागणारे अवजारे उपलब्ध करून देतात. शिवाय भाजीपाला आणि इतर पीके घेऊन मालाला बाजारपेठ देखील उपलब्ध करून देतात. 

शिक्षक असून केवळ ज्ञानार्जनात न अडकता स्वतःच्या शेती बरोबरच आपण इतर शेतकऱ्यांची देखील शेती प्रगत करू शकतो हे मुंजाभाऊ शीलवणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन कष्टाची तयारी ठेवली तर आत्महत्या करण्याचा विचार देखील शेतकऱ्यांच्या मनात येणार नाही अशा भावाना त्यांचे गावकरी व्यक्त करतात.   

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget