एक्स्प्लोर

Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न? 'त्या' दोन जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याची नोंद

Marathwada Drought : यावर्षी मराठवाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.

Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही प्रशासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  15 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या पैसेवारीच्या अनुषंगाने मराठवाड्यात सरसकट दुष्काळ (Drought In Marathwada) जाहीर केला जात आहे.  यामुळे पीक विमा परतावा देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करू शकतात आणि त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. 

यावर्षी मराठवाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे. 15 डिसेंबरला जाहीर केलेल्या अनिवार मध्ये मराठवाड्यातील पीक आनिवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे संपूर्णपणे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय स्तरावर आटापिटा सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेल्या नांदेड जिल्ह्यात आणि सरासरीच्या 73 टक्के पाऊस झालेल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.  यावर्षी हिंगोली नांदेड दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक भागात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी तर कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी सुद्धा झाली होती. परंतु कुठेही 21 दिवसाचा खंड पाहायला मिळाला नाही. तरीही मात्र प्रशासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी घाट घातला जात असल्याचे चित्र आहे. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकावर यलो मोझॅक यासारख्या अनेक बुरशीजन्य रोगामुळे उत्पादकता घटली आहे. त्याचबरोबर उशिरा झालेल्या पेरण्यामुळे सुद्धा उत्पादनात घट झाली आहे आणि त्यामुळे पैसेवारी कमी आली आहे. परंतु दुष्काळ आणि पैसेवारीचा असा फारसा संबंध नाही असं मत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले 

तर दुसरीकडे नांदेड शेजारी असलेल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सरासरीच्या 73 टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर हिंगोली जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ईसापुर सिद्धेश्वर येलदरी या धरणामध्ये मुबलक स्वरूपात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळी परिस्थिती नाही असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत

मराठवाड्यातील (Marathwada) विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील 8 हजार 496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 652 गावांचा अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
बारामती तालुक्याला गारपीटीचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान, बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
बारामती तालुक्याला गारपीटीचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान, बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
Monsoon Alert: आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी 'सुखसरीं'चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती
आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी 'सुखसरीं'चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Weather Monsoon Update: राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; पण, 10 जूनपर्यंत मान्सून नाहीच; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; पण, 10 जूनपर्यंत मान्सून नाहीच; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget