एक्स्प्लोर

Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न? 'त्या' दोन जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याची नोंद

Marathwada Drought : यावर्षी मराठवाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.

Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही प्रशासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  15 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या पैसेवारीच्या अनुषंगाने मराठवाड्यात सरसकट दुष्काळ (Drought In Marathwada) जाहीर केला जात आहे.  यामुळे पीक विमा परतावा देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करू शकतात आणि त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. 

यावर्षी मराठवाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे. 15 डिसेंबरला जाहीर केलेल्या अनिवार मध्ये मराठवाड्यातील पीक आनिवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे संपूर्णपणे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय स्तरावर आटापिटा सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेल्या नांदेड जिल्ह्यात आणि सरासरीच्या 73 टक्के पाऊस झालेल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.  यावर्षी हिंगोली नांदेड दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अनेक भागात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी तर कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी सुद्धा झाली होती. परंतु कुठेही 21 दिवसाचा खंड पाहायला मिळाला नाही. तरीही मात्र प्रशासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी घाट घातला जात असल्याचे चित्र आहे. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकावर यलो मोझॅक यासारख्या अनेक बुरशीजन्य रोगामुळे उत्पादकता घटली आहे. त्याचबरोबर उशिरा झालेल्या पेरण्यामुळे सुद्धा उत्पादनात घट झाली आहे आणि त्यामुळे पैसेवारी कमी आली आहे. परंतु दुष्काळ आणि पैसेवारीचा असा फारसा संबंध नाही असं मत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले 

तर दुसरीकडे नांदेड शेजारी असलेल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सरासरीच्या 73 टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर हिंगोली जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ईसापुर सिद्धेश्वर येलदरी या धरणामध्ये मुबलक स्वरूपात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळी परिस्थिती नाही असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत

मराठवाड्यातील (Marathwada) विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील 8 हजार 496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 652 गावांचा अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक
कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget