एक्स्प्लोर

Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार, 500 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली

यवतमाळ जिल्ह्यात काल दुपारपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा पहाटेपासून हजेरी लावली आहे. अती पावसामुळं 500 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

Yavatmal Rain : राज्यातील काही जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात काल दुपारपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा पहाटेपासून हजेरी लावली आहे. जिल्ह्यात पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. 11 ते 13 जुलैपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. अती पावसामुळं वणी, राळेगाव, झारीजामनी, घाटंजी, बाभूळगाव, तालुक्यातील जवळपास 450 ते 500 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसानं झालं आहे. 

कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांना फटका

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, वणी कळंब, बाभूळगाव या तालुक्यातील नदी नाल्यांच्या काठावरील शेतातील पिकं पुरामुळं खरवडून गेली आहेत. मागील आठवडाभरापासून पावसाची जोरदार हजेरी सुरु होती. अशातच 12 ते 15 तासाच्या उघडीनंतर पुन्हा पावसानं जोर पकडला आहे. राळेगाव-वारा या रोडवरील पुलावरुन पाणी जात असल्यानं वारा या गावचा संपर्क तुटला आहे. तर घाटंजी तालुक्यातील इरुळ-कवठ पुलावरुन पाणी वाहत आहे. अती पावसामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसानं बळीराजा सुखावला होता. मात्र सतत पावसाची रिपरिप सुरु असल्यानं कपाशी, तूर, सोयाबीन, पिकांना फटका बसला आहे. 


Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार, 500 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली

नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन

पावसामुळे डवरणी, खुरपणी, निंदनं आदी शेतीची कामं खोळंबळी आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पाऊस चालू असताना नागरिकांनी नदी नाल्यांच्या काटावर, बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळं राज्यात काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम  या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा, शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता, मागण्या काय?
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget