एक्स्प्लोर

Farmer Success: माजी सनदी अधिकाऱ्यानं दीड एकरात आल्यातून कमावले 10 लाखांचे उत्पन्न, एकरी खर्च किती लागला? कसं वाढवलं उत्पन्न ?

शेतीत नियोजन, योग्य पीक निवड आणि बाजाराची जाण असेल, तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे किवळ आणि आसपासच्या परिसरात आले पिकाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.

Satara Farmer Success: साताऱ्यातील कऱ्हाड तालुक्यातल्या  किवळ येथील तानाजीराव साळुंखे हे नाव आज परिसरातील शेतकरयाची  सध्या गावात एकच चर्चाय  हा शेतकरी सध्या अनेकांसाठी   प्रेरणादायी ठरत आहे. सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर त्यांनी निवृत्तीनंतर जीवनातील नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले आणि ते थेट शेतीत उतरले. कमी पाण्यावर येणारं नगदी पीक म्हणून तानाजीराव साळुंखे यांनी दीड एकरात आल्याची लागवड केली. आता ते एकरी  10 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न कमावतायत. मातीशी असलेली ओळख, शेताशी असलेलं नातं, आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा या भावनांमधूनच त्यांच्या कृषीप्रवासाची सुरुवात झाली. (Agriculture Success)

दीड एकरातून 10 लाख कमावले 

शेतीकडे पाहताना त्यांनी सर्वप्रथम जमिनीची क्षमता, परिसरातील हवामान, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेच्या गरजा यांचा अभ्यास केला.  ऊस हे पारंपरिक, पण पाणीखाऊ पीक बाजूला सारून त्यांनी ‘सातारी आले’ या नगदी पिकावर भर दिला. आले हे पिक एकीकडे परिश्रम व व्यवस्थापन मागते, पण योग्य तंत्रज्ञान आणि मातीची योग्य तयारी केली, तर ते चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकते यावर त्यांचा विश्वास होता. 

साळुंखे यांनी मुरमाड आणि निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. जमिनीची दोनदा नांगरट, दोनदा फणसणी करून ती भुसभुशीत केली. सेंद्रिय खतांचा विपुल वापर करून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली. साडेचार फुटांच्या अंतराने उथळ सरी सोडून बेड तयार केले आणि या बेडवर आलेची लागवड करण्यात आली. एकरी खर्च तब्बल 3 लाखांच्या घरात गेला, परंतु पीक व्यवस्थापनात त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. चांगले उत्पन्न मिळाल्याने 10 लाखांचे उत्पन्न निघण्यास मदत झाली. ७५ गाड्यांची आले विक्री झाली. 

सातारी आल्याची कमाल!

या काटेकोर नियोजनाचा फायदा म्हणून अवघ्या दीड एकर क्षेत्रातून तब्बल 75 गाड्या आल्याचे उत्पादन तयार झाले. उत्पन्नाच्या दृष्टीने पाहता, त्यांना 10 लाखांपर्यंतची रक्कम झाली. मात्र येथूनच खरी अडचण सुरू झाली.बाजारातील व्यापाऱ्यांनी ‘जुनं’ आणि ‘नवं’ असे दर ठरवून आल्यात भेदभाव केला. जुन्या आल्याला 18 हजार तर नव्या आल्याला 12 हजार रुपये दर मिळत असल्याने एकूण नफ्यावर परिणाम झाला. तरीही अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळाल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.

साळुंखे यांची ही कहाणी म्हणजे केवळ पिकाच्या यशाची गोष्ट नाही, तर एक निवृत्त अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर केलेल्या शेती प्रयोगाची आहे.  शेतीच्या भावांमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना स्वतः एखादा प्रयोग करून पाहावा असं वाटण्या मागची ही गोष्टय.  त्यांच्या शेताला आज परिसरातील अनेक शेतकरी भेट देत आहेत. आले पिकाची लागवड, व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती आणि पाण्यावरील बचत याबाबत ते मार्गदर्शन घेत आहेत.साळुंखे यांचा अनुभव स्पष्ट सांगतो शेतीत नियोजन, योग्य पीक निवड आणि बाजाराची जाण असेल, तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे किवळ आणि आसपासच्या परिसरात आले पिकाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget