एक्स्प्लोर

Farmer Success: माजी सनदी अधिकाऱ्यानं दीड एकरात आल्यातून कमावले 10 लाखांचे उत्पन्न, एकरी खर्च किती लागला? कसं वाढवलं उत्पन्न ?

शेतीत नियोजन, योग्य पीक निवड आणि बाजाराची जाण असेल, तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे किवळ आणि आसपासच्या परिसरात आले पिकाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.

Satara Farmer Success: साताऱ्यातील कऱ्हाड तालुक्यातल्या  किवळ येथील तानाजीराव साळुंखे हे नाव आज परिसरातील शेतकरयाची  सध्या गावात एकच चर्चाय  हा शेतकरी सध्या अनेकांसाठी   प्रेरणादायी ठरत आहे. सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर त्यांनी निवृत्तीनंतर जीवनातील नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले आणि ते थेट शेतीत उतरले. कमी पाण्यावर येणारं नगदी पीक म्हणून तानाजीराव साळुंखे यांनी दीड एकरात आल्याची लागवड केली. आता ते एकरी  10 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न कमावतायत. मातीशी असलेली ओळख, शेताशी असलेलं नातं, आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा या भावनांमधूनच त्यांच्या कृषीप्रवासाची सुरुवात झाली. (Agriculture Success)

दीड एकरातून 10 लाख कमावले 

शेतीकडे पाहताना त्यांनी सर्वप्रथम जमिनीची क्षमता, परिसरातील हवामान, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेच्या गरजा यांचा अभ्यास केला.  ऊस हे पारंपरिक, पण पाणीखाऊ पीक बाजूला सारून त्यांनी ‘सातारी आले’ या नगदी पिकावर भर दिला. आले हे पिक एकीकडे परिश्रम व व्यवस्थापन मागते, पण योग्य तंत्रज्ञान आणि मातीची योग्य तयारी केली, तर ते चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकते यावर त्यांचा विश्वास होता. 

साळुंखे यांनी मुरमाड आणि निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. जमिनीची दोनदा नांगरट, दोनदा फणसणी करून ती भुसभुशीत केली. सेंद्रिय खतांचा विपुल वापर करून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली. साडेचार फुटांच्या अंतराने उथळ सरी सोडून बेड तयार केले आणि या बेडवर आलेची लागवड करण्यात आली. एकरी खर्च तब्बल 3 लाखांच्या घरात गेला, परंतु पीक व्यवस्थापनात त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. चांगले उत्पन्न मिळाल्याने 10 लाखांचे उत्पन्न निघण्यास मदत झाली. ७५ गाड्यांची आले विक्री झाली. 

सातारी आल्याची कमाल!

या काटेकोर नियोजनाचा फायदा म्हणून अवघ्या दीड एकर क्षेत्रातून तब्बल 75 गाड्या आल्याचे उत्पादन तयार झाले. उत्पन्नाच्या दृष्टीने पाहता, त्यांना 10 लाखांपर्यंतची रक्कम झाली. मात्र येथूनच खरी अडचण सुरू झाली.बाजारातील व्यापाऱ्यांनी ‘जुनं’ आणि ‘नवं’ असे दर ठरवून आल्यात भेदभाव केला. जुन्या आल्याला 18 हजार तर नव्या आल्याला 12 हजार रुपये दर मिळत असल्याने एकूण नफ्यावर परिणाम झाला. तरीही अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळाल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.

साळुंखे यांची ही कहाणी म्हणजे केवळ पिकाच्या यशाची गोष्ट नाही, तर एक निवृत्त अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर केलेल्या शेती प्रयोगाची आहे.  शेतीच्या भावांमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना स्वतः एखादा प्रयोग करून पाहावा असं वाटण्या मागची ही गोष्टय.  त्यांच्या शेताला आज परिसरातील अनेक शेतकरी भेट देत आहेत. आले पिकाची लागवड, व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती आणि पाण्यावरील बचत याबाबत ते मार्गदर्शन घेत आहेत.साळुंखे यांचा अनुभव स्पष्ट सांगतो शेतीत नियोजन, योग्य पीक निवड आणि बाजाराची जाण असेल, तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे किवळ आणि आसपासच्या परिसरात आले पिकाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Embed widget