एक्स्प्लोर

#ओलादुष्काळ : जिवंत असूनही शेतकरी मेलाय, जळणारही नाही कारण ओला दुष्काळाय 

#ओलादुष्काळ : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली.

#ओलादुष्काळ : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली. त्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. त्यामुळे पिचलेल्या पोशिंद्याला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी सोशल मीडियातून #ओलादुष्काळ जाहीर करण्यासाठी एल्गार करण्यात आला आहे. 

राज्यातील पिकांची झालेली नासाडी पाहता #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओलादुष्काळ या ट्रेंडवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे  ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सोशल मीडियातून करण्यात येत आहे. आनंदाच्या शिध्यासोबत जर तुम्ही पिकविमा, अनुदान दिले असते, तर आमची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदी झाली असती, असेही काही पोस्टमधून म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी वेगवेगळ्या स्लोगनही सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. 

शेतकऱ्यांची जेव्हा बसेल जीवनाची घडी
उच्चशिक्षित होईल शेतकऱ्यांची पिढी
पीक मालाचा भाव ठरवेल हा बळी
तेव्हाच आमची साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

---------------

दंगली माजवून तुम्ही भाजता सत्तेची पोळी
आंदोलकच झेलत असतो छातीवरती गोळी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

-----------------

दंगली माजवून तुम्ही भाजता सत्तेची पोळी
आंदोलकच झेलत असतो छातीवरती गोळी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

-------------

काय झक् मारणार लाल दिव्याची गाडी 
सत्ताधिशांचे बंगले अन् माडीवर माडी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

----------------

अरे! ह्या ही वेळेस नापिकीने 
आणली आत्महत्येची पाळी!
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

---------------

काय करू मी कारभारणी,
दिवाळं आलं, दिवाळी नाही, 
गहाण ठेवलेलं गंठन सोडवायला
कारभारच आपला राहिला नाही!

-------------

जेव्हा वाट मी पाहतो तू रुसुन बसतो! 
आज नको असताना डोक्यावर तू कोसळतो !!

---------------

जिवंत असूनही शेतकरी आज मेला आहे.
जळणार ही नाही तो कारण दुष्काळ ओला आहे.

----------------

असच आमच्या आयुष्यान उघड्या डोळ्यांनी मरण पाहायचं ! 
उभ्या जगाचा पोशिंदा म्हणुन त्यान कायम उपाशी राहायचं..!

------------------

कोणाला भेटली ढाल, तर कोणाला भेटली मशाल
पण कोणत्याच सरकारला दिसेना शेतकऱ्याचे हाल

------------------

ए. सी.त बसणाऱ्यांनो
रुमणं हातात घेऊन बघा
माझ्या बळीराजाच काळीज लेवून
एक दिवस जगून बघा

------------------

पेरण्याअगोदर आणि पेरून झाल्यावर शेतकरी तुझ्यासाठीच तरसतो, मग 
काढणीला आल्यावरच बाजार कोसळतो आणि का तु बेभान बरसतो..!

-------------------

कृषीप्रधान देशात, 
शेतकरी बेहाल !
नेते बनतात,
रातोरात मालामाल !

-----------------------

भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली…सोयाबीन विकताना दलाली झाली, पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन तेलाची किंमत दुप्पट झाली!

---------------
अतिवृष्टी होऊन अनुदान नाकारलं,
म्हणून आता आम्ही रणशिंग पुकारलं

--------------------

उठ वेड्या, तोड बेड्या,
लढाईत सामील हो आता गड्या
शेतकऱ्याच्या कष्टावर जगाने खूप कमावलं,
माझ्या बापाने मात्र जीवन गमावलं

-------------------

खूप लढलो नेत्यांसाठी,
आता लढू शेतकऱ्यांसाठी
सोयाबीन गेलयं, कापूस गेलाय
उघड्यावर आलंय घर-दार,
सरकार देईल का आधार..?

--------------------

कशाचा पंचनामा करायचाय?
पिकांचा की शेतकरी मृतदेहाचा?

------------------

बोनसच्या जीवावर तुमची दिवाळी तुपाशी,
सरकार देतंय शेतकऱ्यांना फाशी

--------------

कर्ज घेऊन दिवाळी आली,
वर यंदाही नापिकी झाली
घोर मनाला लावू नका,
पाठ जगाला दाऊ नका,
साथीला आम्ही आहोत ना,
जहर तेवढं खाऊ नका !

------------------------

गावचा खाता आटा, 
मग आता शेतकरी बापासाठी 
खर्च करू थोडासा डेटा

---------------------

मुख्यमंत्री एकनाथ,
शेतकरी अनाथ

-------------------

मातीत... मातीत मळतात माणसं,
उन्हात...उन्हात तळतात माणसं,
कशी जीवाला खातात खस्ता,
त्याचा जीव लै सस्ता...

-------------------

चिखलाचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता

---------------

शेतकरी पुत्रांनो जागे व्हा,
आज पीक विमा खाल्ला,
उद्या जमीन खातील

------------

परतीच्या पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर 

दुसरीकडे परतीच्या पावसाने निरोप घेतला असला, तरी पिकांची मात्र जिल्ह्यात चांगलीच नासाडी झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन आणि भाजीपाल्याला बसला आहे. या संदर्भात प्रत्येकांच्या पंचनामाचा अंतिम अहवाल लवकरच येईल त्यानंतर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनीती दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 

पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये 3107 हेक्टर क्षेत्रांमधील पिकाचे नुकसान झाले आहे, अजूनही पंचनामे सुरू आहेत. पंचनामा झाल्यावर हा अहवाल शासनाकडे पाठवून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. 

जिल्ह्यातील 944 हेक्टरवरील भाजीपाला, 871 हेक्टर सोयाबीन, 54.30 हेक्टर भात, 858 हेक्टर भुईमूग, 80 हेक्टरवरील विविध फुले, 275 हेक्‍टर इतर पिके व 25 हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 2313 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यात 933, शाहूवाडी 49 हेक्टर, करवीर तालुक्यात 8.10 तर भुदरगड मधील 4 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget