एक्स्प्लोर

#ओलादुष्काळ : जिवंत असूनही शेतकरी मेलाय, जळणारही नाही कारण ओला दुष्काळाय 

#ओलादुष्काळ : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली.

#ओलादुष्काळ : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली. त्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. त्यामुळे पिचलेल्या पोशिंद्याला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी सोशल मीडियातून #ओलादुष्काळ जाहीर करण्यासाठी एल्गार करण्यात आला आहे. 

राज्यातील पिकांची झालेली नासाडी पाहता #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओलादुष्काळ या ट्रेंडवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे  ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सोशल मीडियातून करण्यात येत आहे. आनंदाच्या शिध्यासोबत जर तुम्ही पिकविमा, अनुदान दिले असते, तर आमची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदी झाली असती, असेही काही पोस्टमधून म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी वेगवेगळ्या स्लोगनही सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. 

शेतकऱ्यांची जेव्हा बसेल जीवनाची घडी
उच्चशिक्षित होईल शेतकऱ्यांची पिढी
पीक मालाचा भाव ठरवेल हा बळी
तेव्हाच आमची साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

---------------

दंगली माजवून तुम्ही भाजता सत्तेची पोळी
आंदोलकच झेलत असतो छातीवरती गोळी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

-----------------

दंगली माजवून तुम्ही भाजता सत्तेची पोळी
आंदोलकच झेलत असतो छातीवरती गोळी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

-------------

काय झक् मारणार लाल दिव्याची गाडी 
सत्ताधिशांचे बंगले अन् माडीवर माडी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

----------------

अरे! ह्या ही वेळेस नापिकीने 
आणली आत्महत्येची पाळी!
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

---------------

काय करू मी कारभारणी,
दिवाळं आलं, दिवाळी नाही, 
गहाण ठेवलेलं गंठन सोडवायला
कारभारच आपला राहिला नाही!

-------------

जेव्हा वाट मी पाहतो तू रुसुन बसतो! 
आज नको असताना डोक्यावर तू कोसळतो !!

---------------

जिवंत असूनही शेतकरी आज मेला आहे.
जळणार ही नाही तो कारण दुष्काळ ओला आहे.

----------------

असच आमच्या आयुष्यान उघड्या डोळ्यांनी मरण पाहायचं ! 
उभ्या जगाचा पोशिंदा म्हणुन त्यान कायम उपाशी राहायचं..!

------------------

कोणाला भेटली ढाल, तर कोणाला भेटली मशाल
पण कोणत्याच सरकारला दिसेना शेतकऱ्याचे हाल

------------------

ए. सी.त बसणाऱ्यांनो
रुमणं हातात घेऊन बघा
माझ्या बळीराजाच काळीज लेवून
एक दिवस जगून बघा

------------------

पेरण्याअगोदर आणि पेरून झाल्यावर शेतकरी तुझ्यासाठीच तरसतो, मग 
काढणीला आल्यावरच बाजार कोसळतो आणि का तु बेभान बरसतो..!

-------------------

कृषीप्रधान देशात, 
शेतकरी बेहाल !
नेते बनतात,
रातोरात मालामाल !

-----------------------

भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली…सोयाबीन विकताना दलाली झाली, पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन तेलाची किंमत दुप्पट झाली!

---------------
अतिवृष्टी होऊन अनुदान नाकारलं,
म्हणून आता आम्ही रणशिंग पुकारलं

--------------------

उठ वेड्या, तोड बेड्या,
लढाईत सामील हो आता गड्या
शेतकऱ्याच्या कष्टावर जगाने खूप कमावलं,
माझ्या बापाने मात्र जीवन गमावलं

-------------------

खूप लढलो नेत्यांसाठी,
आता लढू शेतकऱ्यांसाठी
सोयाबीन गेलयं, कापूस गेलाय
उघड्यावर आलंय घर-दार,
सरकार देईल का आधार..?

--------------------

कशाचा पंचनामा करायचाय?
पिकांचा की शेतकरी मृतदेहाचा?

------------------

बोनसच्या जीवावर तुमची दिवाळी तुपाशी,
सरकार देतंय शेतकऱ्यांना फाशी

--------------

कर्ज घेऊन दिवाळी आली,
वर यंदाही नापिकी झाली
घोर मनाला लावू नका,
पाठ जगाला दाऊ नका,
साथीला आम्ही आहोत ना,
जहर तेवढं खाऊ नका !

------------------------

गावचा खाता आटा, 
मग आता शेतकरी बापासाठी 
खर्च करू थोडासा डेटा

---------------------

मुख्यमंत्री एकनाथ,
शेतकरी अनाथ

-------------------

मातीत... मातीत मळतात माणसं,
उन्हात...उन्हात तळतात माणसं,
कशी जीवाला खातात खस्ता,
त्याचा जीव लै सस्ता...

-------------------

चिखलाचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता

---------------

शेतकरी पुत्रांनो जागे व्हा,
आज पीक विमा खाल्ला,
उद्या जमीन खातील

------------

परतीच्या पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर 

दुसरीकडे परतीच्या पावसाने निरोप घेतला असला, तरी पिकांची मात्र जिल्ह्यात चांगलीच नासाडी झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन आणि भाजीपाल्याला बसला आहे. या संदर्भात प्रत्येकांच्या पंचनामाचा अंतिम अहवाल लवकरच येईल त्यानंतर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनीती दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 

पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये 3107 हेक्टर क्षेत्रांमधील पिकाचे नुकसान झाले आहे, अजूनही पंचनामे सुरू आहेत. पंचनामा झाल्यावर हा अहवाल शासनाकडे पाठवून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. 

जिल्ह्यातील 944 हेक्टरवरील भाजीपाला, 871 हेक्टर सोयाबीन, 54.30 हेक्टर भात, 858 हेक्टर भुईमूग, 80 हेक्टरवरील विविध फुले, 275 हेक्‍टर इतर पिके व 25 हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 2313 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यात 933, शाहूवाडी 49 हेक्टर, करवीर तालुक्यात 8.10 तर भुदरगड मधील 4 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टॉवर लाईनचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन सुरु
टॉवर लाईनचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन सुरु
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget