एक्स्प्लोर

Agriculture News : जळगावच्या शेतकऱ्याची कमाल, केळीच्या शेतीमधून एक कोटी कमवले

Agriculture News : केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत.

Agriculture News : केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत. एक कोटी  रुपयांचा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आमचं काही चुकत असेल पण असं काहीही नाही तुम्ही जे वाचलेय ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यात ऐकीकडं केळी पिकावर सी एम वी रोगानं थैमान घातले होतं. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. शेतकरी अडचणीत सापडला होते. अशातच या शेतकऱ्यांनं कोट्यवधींची कमाई केली आहे. 
 
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने स्वत:च्या दीड एकर शेतीसह दुसऱ्याची साठ एकर शेती केली होती. यामध्ये केळीच्या उत्पादनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या हून अधिक रुपयांची कमाई केली आहे. ऐन दिवाळीचा काळात पाटील यांना हे उत्पन्न मिळाल्याने राजेंद्र पाटील यांनी आपल्या शेतात राबणाऱ्या साल्दार,मजूर,सहकार्य करणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी शेतात कामा करणाऱ्या मजुरांचा आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा राजेंद्र पाटील यांनी सत्कार समारंभासह त्यांना कपडे, अन्न धान्य, मिठाई वाटप करून एक अनोख्या पद्धतीने ऋण व्यक्त करत दिवाळी साजरी केली आहे. 

   शेतीमध्ये आपल्याला एक कोटी हून अधिक रुपयांची कमाई होण्यामध्ये आपल्या शेतात अहोरात्र काम करणाऱ्या मजूर, साल्दार यांचं मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदान मुळेच आपण आज एवढं उत्पन्न शेती मध्ये मिळवू शकलो. त्यामुळे त्यांचं ऋण व्यक्त केलेच पाहिजे अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दीड एकर शेती आहे. एकेकाळी शेतात मजुरी करत असल्याने राजेंद्र पाटील यांना शेतीच चांगलं ज्ञान अवगत झाले. मजुरी करीत असतानाच कृषी पदवी मिळवली. राजेंद्र पाटील हे नोकरीला ही लागले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाद निर्माण झाल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा शेतीकडे वळले. आपल्याकडे जमीन कमी असल्याने त्यात पुरेसे उत्पन्न घेता येत नसल्याने पाटील यांनी सुरुवातीला काही जमीन भाडे तत्वावर घेत शेती करण्यात सुरुवात केली. त्यात त्यांना चांगलं यश मिळत गेल्याने आज पाटील यांच्याकडे पासष्ट एकर जमीन ही भाडेतत्वावर आहे. तर दीडशे जण त्यांच्या कडे काम करतात. 

राजेंद्र पाटील हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी नेहमीच कृषीच्या नवीन तंत्राचा वापर आपल्या शेतीसाठी केला. जैन तंत्राने केळीची शेती केल्याने त्यांना उच्च दर्जाची निर्यातक्षम  केळी ही निर्माण करण्याचं तंत्र अवगत झाले. त्यांच्या केळीला इतरांच्या पेक्षा जास्त मागणीही असते आणि शिवाय भावही जास्त मिळत असल्याने राजेंद्र पाटील यांना चांगलाच नफा यातून मिळाला आहे. 

आपल्या शेतीमध्ये यश मिळण्यामागे शेतीमध्ये मेहनत सोबत नवीन तंत्राचा उपयोग करणे हे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच शेतकऱ्यांनी आपल्या शेती व्यतिरिक्त अन्य गावच्या राजकारणात आणि भानगडीपासून दूर राहणे ही गरजेचे असल्याचं सांगताना आपण या सर्व पासून दूर राहून केवळ शेतीकडेच लक्ष दिल्याने हे यश आपल्याला मिळाल्याचे राजेंद्र पाटील सांगतात.  


 राजेंद्र पाटील हे शेतात आले तरी आणि नाही आलो तरी आम्ही त्यांच्या शेतीत प्रामाणिक पणांने काम केले आणि त्याचा फायदा शेती मध्ये पाटील याना चांगले उत्पन्न आले भावही मिळाला ,पाटील यांच्या आनंद मध्ये आमचाही आनंद आहे,त्यांनी आमचा  मजुरांचा सत्कार केला त्याचा खूप आनंद झाला आमचा सत्कार आज पर्यंत कोणी केला नव्हता आणि केला ही नसता त्यांनी आमच्या चांगल्या कामाची दखल घेतली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे एका कामगाराने सांगितलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून जालन्यात दोन जणांचा मृत्यू, तर जनावरेही दगावली, शेती पिकांना मोठा फटका
राज्यात अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून जालन्यात दोन जणांचा मृत्यू, तर जनावरेही दगावली, शेती पिकांना मोठा फटका
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
Dattatray Bharne : आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, शेती क्षेत्रावर मोठा परिणाम; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
युरियाच्या साठ्याबाबत काळजी घ्या, आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम; मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget