पुणे-सातारा महामार्गाचं काम रखडलं असतानाही टोलवाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2018 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे-सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम गेल्या साडेसात वर्षांपासून रखडलं आहे. मात्र असं असतानाही या रस्त्यावरील खेड-शिवापूर आणि आणेवाडी या दोन टोलनाक्यांवरील टोलवसुलीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे ते सातारा दरम्यान 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांमुळे वाहनचालक आणि प्रवासी अगोदरच त्रास सहन करत होते. अनेक अपघात रस्त्यावर घडतात. रस्त्यावर वसूल केल्या जाणाऱ्या टोलमध्ये पुढील महिन्यापासून वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला आहे.