नवी दिल्ली : 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये भाजपचा मोठा विजय, पंतप्रधान मोदींना विश्वास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2018 10:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय मोठा असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. एएनआय आणि टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. एनसीआर, आरक्षण आणि मॉब लिंचिंगसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली. जातीनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. तर एनसीआरच्या विषयावर बोलताना त्यांनी कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नसल्याचंही सांगितलं. तर बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी एका वर्षात एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आल्याचंही मोदी म्हणाले. आमच्या ४ वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी आहे. त्यामुळे आघाडीच्या हाती सत्ता न देता एकाच पक्षाला बहुमत मिळेल, असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.