एक्स्प्लोर
Nashik: हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी, प्रदूषित नदीमुळे गाव तहानलेलं ABP Majha
जल जीवन मिशन नावाची ३ लाख ६० हजार कोटींची योजना राबवण्याचं एक मोठ स्वप्न सरकारनं लोकांना दाखवलं.... अनेकांना तर घरच्या अंगणात पाणी खेळण्याची स्वप्न पडली... पण सरकारच्या योजना समाजात तळापर्यंत कशा झिरपत नाहीत याचं दाहक वास्तव समोर आलंय. आपल्या महाराष्ट्रातलंच एक गाव..... शहरापासून फार दूरही नसेल.. नदी उशाला, मात्र प्रदुषणाचं पातक घेऊन वाहणारी.... पण त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी इथल्या बाईची परवड आणि तिचा प्रवास पाहिला तर तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.. कोणतं आहे हे गाव... आणि तिथं काय घडतंय... निबर व्यवस्थेचे डोळे उघडायला लावणारा हा रिपोर्ट पाहुया
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















