Bhiwandi : रस्ते दुरुस्ती करा अन्यथा टोलवसुली बंद पाडू; मनसेच्या Avinash Jadhav यांचा इशारा
आधी रस्ते दुरुस्त करा अन्यथा टोलवसुली करु देणार नाही, असा इशारा मनसेकडून राज्य सरकारला देण्यात आलाय. भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई तालुक्यातील कामण चिंचोटी फाटापर्यंत बनलेल्या अंजुरफाटा खारबाव या राज्य महामार्गाची दुरवस्था झालीय. याच रस्त्याची काल मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पाहणी केली. यावेळी येत्या ४ दिवसात रस्ते दुरुस्ती झाली नाही तर टोलवसुली कायमची बंद पाडण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. आणि रस्ते दुरवस्थेमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेणार का? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला विचारलाय. नुकताच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची कामं ठेकेदारांमुळे निकृष्ट आणि संथगतीने होत असल्याचा आरोप केला होता.
























