Zero Hour Women Safety : गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही? चर्चा महिला सुरक्षेची
Zero Hour Women Safety : गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही? चर्चा महिला सुरक्षेची
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य अस्तित्वात आहे की नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झालीय. आता पुण्यात तरुणीचा अतिशय निर्घृण पद्धतीने खुन केल्याचे उघडकीस आले आहे. रत्नागिरी येथे एका तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली. याखेरीज पुणे परिसरातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आले. दुसरीकडे गुन्हेगारांना कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नसून पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार केल्याची घटनाही घडली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. हे सत्ताधाऱ्यांचे विशेषतः गृहमंत्र्यांचे घोर अपयश आहे. राज्यातील ढासळलेल्या कायदा सु्व्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत.

















