एक्स्प्लोर
Ratnagiri : मच्छिमारांसमोर संकट, कोकणात वातावरण बदलामुळे मासेमारीवर परिणाम ABP Majha
#Ratnagiri #KonkanRainUpdates #ABPMajha
कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. दोन महिन्याच्या बंदीनंतर 1 ऑगस्टनंतर मासेमारीला सुरूवात होते. पण मुसळधार पाऊस, वातावरणात सातत्यानं होत असलेले बदल, खवळलेला समुद्र यामुळे अद्याप देखील मासेमारी बंद आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत शासन निर्णयानुसार मासेमारी पूर्णता बंद असते. पण, 1 ऑगस्टपासून मात्र मासेमारीला सुरूवात होते. यंदा मात्र बोटी किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मच्छिमारां समोर अनखीन एक संकट उभं राहीलं आहे.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















