एक्स्प्लोर

Murlidhar Mohol On Devendra Fadnavis : देवेंद्रजी खूप मोठी ताकद, त्यांनी सरकारमध्येच रहावं : मोहोळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, राज्यातील राजकारणाचं विश्लेषण करताना अनेकांनी महायुतीच्या पराभवाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. तर, विरोधकांकडून महायुतीच्या पराभवावरुन त्यांच्या गत काही वर्षातील राजकारणवर भाष्य केलं जात आहे. अनेकांकडून देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं जात आहे. मात्र, या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच, या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. नेतृत्व म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. मात्र, यापुढे पक्षाचं पूर्णवेळ काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदावरुन पदमुक्त करण्याची विनंती मी पक्ष नेतृत्वाकडे करत असल्याचेही फडणवीसांनी म्हटले होते. आता, फडणवीसांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

पराभवानंतर दु:ख होणं स्वाभाविक आहे, किंवा आपल्यामुळेच हे झालं अस त्यांना वाटत असावं. पण, मला स्वत: त्यांना सांगायचं आहे की, यश-अपयश ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कोणा एकावर ठपका ठेवणे बरोबर नाही. महायुतीचं हे झाड थोडसं वादळामध्ये सापडलं आहे, अशा वेळी जे कॅप्टन्स आहेत, त्यांनी बाजूला होणं हे बरोबर नाही. मजबुतीने सर्वांनी एकत्र राहून येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांची तयारी करायला पाहिजे, असे मत महायुतीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

आम्ही तुमच्यासोबत

एनडीएची जी उलथापालथ झालेली आहे, ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक भागांत झाली आहे. त्यामुळे, याची जबाबदारी केवळ फडणवीसांवर सोपवणे किंवा त्यांनीही ती जबाबदारी स्वत:वर घेणे योग्य नाही. माझं त्यांना एवढचं सांगणं आहे की, तुमच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत, सगळे आमदार आहेत. आता, मजबुतीनं लढलं पाहिजे, हे अपयश येणाऱ्या 4-5 महिन्यात होणाऱ्या निवडणुकांतून धुवून काढलं पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटलं. 

फडणवीसांचं सरकारमध्ये राहणं आवश्यक

मध्येच, जर तुम्ही सरकारमधून दूर झालात, तर सरकारमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे, सरकार सुरळीत चालण्यासाठी फडणवीसांचं सरकारमध्ये राहणं आवश्यक आहे, त्यांनी बाहेर होण्याचा अजिबात प्रयत्न करु नये, अशा शब्दात भुजबळ यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर आपलं मत मांडलं आहे. निवडणुकांमध्ये काही चुका झाल्या असतील, अँटीइन्कमबन्सीचा परिणाम आहे. तसेच, संविधान बदललं जाणार आहे हा नॅरेटीव्ह तयार करण्यात आला या घटनांचा परिणाम झाला. आता जी अडचण निर्माण झालीय, ती सोडवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे भुजबळ यांनी म्हटले. यशाचे बाप सगळे असतात, अपयशाची जबाबदारी कोणी घेत नाहीत. मात्र, ही चर्चा 2 ते 4 दिवस चालणार, त्यानंतर सगळे आपल्या कामाला लागतील. आता, पुढची लढाई लढायची आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

नाशिकच्या पराभवावर भाष्य

नाशिकमधील उमेदवारीवरुन महायुतीच्या मित्रपक्षात काही मतभेद होते, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी उत्तर दिले. हेमंत गोडसे स्वत: म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला. मी माघार घेतल्यानंतरही 12 ते 13 दिवसांनी येथील उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. निर्णय घेणे महत्त्वाचं असतं, पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला हेच एकमेव कारण नाही. नाशिकमधील कांद्याचा प्रश्न, संविधान बदलणार हे नॅरीटीव्ह अशा अनेक विषयांमुळे अडचण निर्माण झाली होती, अशी विविध कारणंही भुजबळ यांनी नाशिकच्या पराभवासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना सांगितली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा, राष्ट्र प्रथम मंत्रासह विस्तार, रविंद्र चव्हाणांकडून गौरवशाली प्रवासाचा आढावा
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा, राष्ट्र प्रथम मंत्रासह विस्तार, रविंद्र चव्हाणांकडून गौरवशाली प्रवासाचा आढावा
KKR vs PBKS Live Score IPL 2026 : पावसाने खेळ बिघडवला, KKR vs पंजाब सामना थांबला; संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकले, आता पुढे काय होणार?
KKR vs PBKS Live : पावसाने खेळ बिघडवला, KKR vs पंजाब सामना थांबला; संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकले, आता पुढे काय होणार?
RR vs MI IPL 2026 : आता खेळ पालटणार! सूर्यकुमार यादव OUT, हार्दिक पांड्या IN... अशी असणार मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11
आता खेळ पालटणार! सूर्यकुमार यादव OUT, हार्दिक पांड्या IN... अशी असणार मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
Embed widget