एक्स्प्लोर
Marathwada Floods | डोळ्यात अश्रू, उभी पिकं आडवी झाली, मराठवाड्याला मदतीची आस, अश्रुंचा बांध फुटला
महापुराच्या वेढ्यात सापडलेल्या संपूर्ण मराठवाड्याला सरकार मदतीची आस लागली आहे. पूरग्रस्तांच्या नजरा सरकार कधी आपले अश्रू पुसणार आणि संसार कधी सावरणार याकडे लागल्या आहेत. एबीपी माझा पूरग्रस्त पीडितांपर्यंत पोहोचला. धाराशिवच्या परंडा भागात सीना नदीचे रौद्ररूप अजूनही ओसरलेले नाही. छतावर जनावरे, डोळ्यात अश्रू आणि उभी पिके क्षणार्धात आडवी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अश्रूंचा बांध फुटला आहे. एका शेतकऱ्याने सांगितले, "माझी खायची पंचतार्यायची पंचता असे काहीच राहिलेलं नाही माझ्यापासून." अनेक शेतकऱ्यांनी आपले सर्वस्व गमावले आहे. पंधरा ते वीस कांड्यांचा ऊस पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. काही घरांवर पंधरा फूट पाणी होते, तर जनावरेही वाहून गेली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात याच गावामध्ये पाहणी करायला येणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















