सरकारनं शेतकऱ्यांचा केसानं गळा कापला; Raju Shetti यांचा राज्य सरकारवर घणाघात
abp majha web team
Updated at:
20 Oct 2021 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारनं शेतकऱ्यांचा केसानं गळा कापला. एकरकमी एफआरपी न दिल्यानं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिवाळी गोड करु देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिलाय. काल दोन वर्षांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विसावी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. त्यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर हल्लाबोल केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी, महापुरात बुडालेल्या उसाला प्रति गुंठा 950 रूपये नुकसान भरपाई द्यावी, अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत करण्यात यावी यासह 12 ठराव करण्यात आले.