Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTeam India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Rohit Sharma : वानखेडे स्टेडियमवर आज विश्वविजेत्या टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. त्याशिवाय ही ट्रॉफी फक्त टीम इंडियाची नाही, तर सगळ्या देशाची आहे, असेही रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर हजारो चाहत्यांसोबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक झाली. त्यानंतर वानखेडेवर जय शाह यांनी 125 कोटींचा चेक सुपूर्द केला. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.
रोहित शर्माने वानखेडेवर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केले. हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक होते,सूर्यकुमार यादवनेही भन्नाट झेल घेतला, असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्मा काय म्हणाला?
"ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे. सामना पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे, मला माझ्या या संघाचा अभिमान आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे कौतुक केले. हार्दिक पांड्याने वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकली होती. रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी केली.