Ahmednagar Fire : नगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य मंत्र्यांची जबाबदारी नाही का ? : चित्रा वाघ
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काल (शनिवारी) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर डॉक्टरांवर झालेल्या कारवाईवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका केली आहे. डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करून प्रश्न सुटतो का आणि रुग्णालयातील आग प्रकरणी आरोग्य मंत्र्यांची जबाबदारी नाही का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.



















